आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती आरबीआयने दिली आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Prepaid Payments Instruments PPIs) बाबती तले अनुपालन (Regulations) न पाळल्याबाबत कंपनीवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की,'ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेने कंप नीची वैधानिक तपासणी केली.'आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्षांवरून आणि या संदर्भात संबंधित पत्राच्या आधारे आरबीआयने फोन पे ला एक नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता फोन पे च्या युक्तिवादानंतरही वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी सादरीकरण विचारात घेतल्यानंतर आरबीआयला असे आढळून आले की कंपनीविरुद्धचा आरोप कायम आहे ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता फोन पे ला आहे.


कंपनीच्या एस्क्रो (Escrow) खात्यातील दिवसाच्या अखेरीस शिल्लक रक्कम थकबाकी असलेल्या पीपीएल आणि व्यापाऱ्यांना काही दिवसांच्या देय रकमेपेक्षा कमी होती आणि कंपनीने आरबीआयला या एस्क्रो खात्यातील कमतरता तात्काळ कळवली नाही.' अ से त्यात म्हटले आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि कंपनीने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर (Validation) निर्णय घेण्याचा बँकेचा हेतू नाही.

Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची