आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती आरबीआयने दिली आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Prepaid Payments Instruments PPIs) बाबती तले अनुपालन (Regulations) न पाळल्याबाबत कंपनीवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की,'ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेने कंप नीची वैधानिक तपासणी केली.'आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्षांवरून आणि या संदर्भात संबंधित पत्राच्या आधारे आरबीआयने फोन पे ला एक नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता फोन पे च्या युक्तिवादानंतरही वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी सादरीकरण विचारात घेतल्यानंतर आरबीआयला असे आढळून आले की कंपनीविरुद्धचा आरोप कायम आहे ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता फोन पे ला आहे.


कंपनीच्या एस्क्रो (Escrow) खात्यातील दिवसाच्या अखेरीस शिल्लक रक्कम थकबाकी असलेल्या पीपीएल आणि व्यापाऱ्यांना काही दिवसांच्या देय रकमेपेक्षा कमी होती आणि कंपनीने आरबीआयला या एस्क्रो खात्यातील कमतरता तात्काळ कळवली नाही.' अ से त्यात म्हटले आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि कंपनीने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर (Validation) निर्णय घेण्याचा बँकेचा हेतू नाही.

Comments
Add Comment

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

आतापर्यंत ६ कोटी लोकांनी ITR भरला आयकर विभाग म्हणाले, 'आतापर्यंत.....

प्रतिनिधी:कर निर्धारण वर्ष (Income Tax Assesment Year) २०२५-२६ साठी आतापर्यंत सहा कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे (ITR Filings) दाखल

Explainer- ITR भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस ! 'या' १५ चुका टाळल्यास तुमचा आयटीआर चुकणारच नाही

आयटीआर (Income Tax Returns) भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे एकप्रकारे करदात्यांना धाकधूक असते. त्यावेळी

प्रकाश महाजन यांनी दिला मनसेचा राजीनामा, पुढे काय करणार ?

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच मनसेला धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश

लग्नाच्या मुद्यावरुन लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना सुनावलं

बीड : लग्नाच्या मुद्यावरुन श्याहण्णव कुळी मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंचपदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी आणि

ChatGPTमागचं भयानक सत्य! पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी? Sam Altman च्या वक्तव्यामुळे जगभरात खळबळ!

AI चॅटबॉट ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमॅन हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच