आरबीआयकडून फोन पे ला २१ लाखांचा दंड

प्रतिनिधी:आरबीआयने (Reserve Bank of India) फोन पे या आघाडीच्या फिनटेक कंपनीला २१ लाखांचा दंड ठोठावला आहे. शुक्रवारी याबद्दल माहिती आरबीआयने दिली आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंटस (Prepaid Payments Instruments PPIs) बाबती तले अनुपालन (Regulations) न पाळल्याबाबत कंपनीवर आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की,'ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भात मध्यवर्ती बँकेने कंप नीची वैधानिक तपासणी केली.'आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याच्या पर्यवेक्षी निष्कर्षांवरून आणि या संदर्भात संबंधित पत्राच्या आधारे आरबीआयने फोन पे ला एक नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामध्ये निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड का लावू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावली होती.मात्र कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता फोन पे च्या युक्तिवादानंतरही वैयक्तिक सुनावणीदरम्यान केलेले तोंडी सादरीकरण विचारात घेतल्यानंतर आरबीआयला असे आढळून आले की कंपनीविरुद्धचा आरोप कायम आहे ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता फोन पे ला आहे.


कंपनीच्या एस्क्रो (Escrow) खात्यातील दिवसाच्या अखेरीस शिल्लक रक्कम थकबाकी असलेल्या पीपीएल आणि व्यापाऱ्यांना काही दिवसांच्या देय रकमेपेक्षा कमी होती आणि कंपनीने आरबीआयला या एस्क्रो खात्यातील कमतरता तात्काळ कळवली नाही.' अ से त्यात म्हटले आहे.आरबीआयने असेही म्हटले आहे की हा दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे आणि कंपनीने तिच्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर (Validation) निर्णय घेण्याचा बँकेचा हेतू नाही.

Comments
Add Comment

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत

धर्मस्वातंत्र्य विधेयक सर्व धर्मांना समानरितीने लागू होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

नागरिकांच्या संरक्षणासाठी असा कायदा आवश्यक मुंबई : "धर्मांतराच्या मुद्द्यावरून राज्यात वारंवार उद्भवणारी

जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले मुंबई : "वर्षाला

मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी दीक्षा कारकर तर बाजार,उद्यान समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार मुंबई : राज्यातील गरजू