आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास

प्रतिनिधी:आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात ७१८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास करणार आहेत. मिझोराम, मणि पूर, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार अशा पाच राज्यांच्या विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान सकाळी मणिपूर दौऱ्यापासून आपल्या विकास कामांची पायाभरणी करतील.माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये ७३ ०० कोटींच्या विकासकामाचे चुराचांदपूर, व मणिपूर अर्बन रोड येथे शिलान्यास करतील. तसेच नॅशनल हायवे प्रोजेक्ट, मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंटचे उद्घाटनही करतील. इंफाळ मध्येही १२०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यामुळे आ यटी सेझ, नवीन पोलिस मुख्यालय यांचा समावेश आहे.


मिझोराममध्येही पंतप्रधान विविध ९००० कोटींची विकासकामांचे उद्घाटन ऐझाल (Aizawl) येथे करणार आहेत. रस्ते, रेल्वे, उर्जा, क्रीडा अशा प्रकारच्या क्षेत्रीय विकासकामाची उभारणी पंतप्रधान करतील. बैराबी साईरंग नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. या रेल्वे प्रकल्पात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ बोगदे, ५५ ब्रीज, ८८ छोटे बोगदे असतील. याशिवाय साईरंग दिल्ली राजधानी एक्सप्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, साईरंग कलकत्ता एक्स्प्रेस इत्यादी गाड्यांना या दरम्यान हिरवा कंदील दा खवला जाईल.


आसाममध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न डॉ भुपेन हजारिका यांच्या स्मरणार्थ गुवाहाटी येथे पंतप्रधान त्यांची १०० वी जयंती साजरी करतील. याशिवाय आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते १८५३० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. ते दरंग येथेही वि विध प्रकल्पांची पायाभरणी करतील, त्यानंतर गोलाघाट येथील आसाम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी प्लांटचे उद्घाटन करतील. गोलाघाट येथे पॉलीप्रोपायलीन प्लांटची पायाभरणी देखील करतील. पश्चिम बंगाल येथे १५ सप्टेंबर रोजी, पंत प्रधान मोदी कोलकाता येथे १६ व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५ चे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पायाभरणी करण्यासाठी सशस्त्र दलांचा हा सर्वोच्च-स्तरीय विचारमंथन मंच आहे.


बिहारमध्ये पंतप्रधान मोदी बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उद्घाटन करतील आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्या साठी नवीन पूर्णिया विमानतळावर अंतरिम टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. ते पूर्णिया येथे सुमारे ३६००० कोटी रुपयांच्या विविध वि कास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करणार आहेत.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.