आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास

प्रतिनिधी:आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात ७१८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण ७१८५० कोटींच्या विकासकामांचा शिलान्यास करणार आहेत. मिझोराम, मणि पूर, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार अशा पाच राज्यांच्या विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. पंतप्रधान सकाळी मणिपूर दौऱ्यापासून आपल्या विकास कामांची पायाभरणी करतील.माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये ७३ ०० कोटींच्या विकासकामाचे चुराचांदपूर, व मणिपूर अर्बन रोड येथे शिलान्यास करतील. तसेच नॅशनल हायवे प्रोजेक्ट, मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंटचे उद्घाटनही करतील. इंफाळ मध्येही १२०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यामुळे आ यटी सेझ, नवीन पोलिस मुख्यालय यांचा समावेश आहे.


मिझोराममध्येही पंतप्रधान विविध ९००० कोटींची विकासकामांचे उद्घाटन ऐझाल (Aizawl) येथे करणार आहेत. रस्ते, रेल्वे, उर्जा, क्रीडा अशा प्रकारच्या क्षेत्रीय विकासकामाची उभारणी पंतप्रधान करतील. बैराबी साईरंग नव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. या रेल्वे प्रकल्पात प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ बोगदे, ५५ ब्रीज, ८८ छोटे बोगदे असतील. याशिवाय साईरंग दिल्ली राजधानी एक्सप्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, साईरंग कलकत्ता एक्स्प्रेस इत्यादी गाड्यांना या दरम्यान हिरवा कंदील दा खवला जाईल.


आसाममध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतरत्न डॉ भुपेन हजारिका यांच्या स्मरणार्थ गुवाहाटी येथे पंतप्रधान त्यांची १०० वी जयंती साजरी करतील. याशिवाय आसाममध्ये पंतप्रधानांच्या हस्ते १८५३० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. ते दरंग येथेही वि विध प्रकल्पांची पायाभरणी करतील, त्यानंतर गोलाघाट येथील आसाम बायो-इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी प्लांटचे उद्घाटन करतील. गोलाघाट येथे पॉलीप्रोपायलीन प्लांटची पायाभरणी देखील करतील. पश्चिम बंगाल येथे १५ सप्टेंबर रोजी, पंत प्रधान मोदी कोलकाता येथे १६ व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५ चे उद्घाटन करणार आहेत. भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पायाभरणी करण्यासाठी सशस्त्र दलांचा हा सर्वोच्च-स्तरीय विचारमंथन मंच आहे.


बिहारमध्ये पंतप्रधान मोदी बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाचे उद्घाटन करतील आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्या साठी नवीन पूर्णिया विमानतळावर अंतरिम टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. ते पूर्णिया येथे सुमारे ३६००० कोटी रुपयांच्या विविध वि कास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील करणार आहेत.

Comments
Add Comment

नवेगाव-नागझिरा प्रकल्पाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका; १८५ गावांतील नागरिकांचा संभ्रम दूर

- वनमंत्री गणेश नाईक यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर धडक मोहीम - परिवहन मंत्र्यांचे आदेश

- नियमोल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार जप्तीची कारवाई मुंबई : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा

अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत