हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला


बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे. ते म्हणाले, "कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आले आहात, आता जात पात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाही तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू" असे थेट आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसीत घुसखोरी करण्यासंदर्भात जाहीर सभेत खरमरीत समाचार घेतला. बीड दौऱ्यावर, गेवराईतील शृंगारवाडी येथे काल ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनादरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांवर निशाणा साधला.

हाके यांनी जरांगेंना डिवचले


तुम्ही आता आमच्यात आले ना तर अकरा विवाह तुमच्या आमच्यात करून त्या आधी जाहीर करा, हाके यांनी असे बोलत थेट जरांगेंना डिवचल्याचे दिसून आले. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही ९६ कुळी, मराठा, क्षत्रिय! आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय. हे मी बोललो नाही बरं का, ते हे स्वर्गीय एनडी पाटील बोलायचे. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले असल्याचे म्हणत हाके यांनी जरांगे पाटलांना लक्ष केले.

यावेळी बोलताना हाकेंनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचे दिसून आले. अजित दादा मी गाजत वाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन मनोज जलांगे यांचा देखील समाचार घेतला.

पुढे बोलताना हाकेंनी आज बीड जिल्ह्यातील मराठा लोकप्रतिनिधींवरदेखील निशाणा साधल्याचे दिसून आले. गेवराईचा आमदार जातीवादी आहे. असे म्हणत त्यांनी चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती? असे म्हणत खासदारावरही टीका केली.

हाके यांच्या या जोरदार टिकेनंतर जरांगे पाटील त्यांना काय प्रतिक्रिया देतायत? यावर मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षण वाद अवलंबून असणार आहे.

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन