हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला


बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे. ते म्हणाले, "कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले ११ विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आले आहात, आता जात पात राहिली का? पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाही तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू" असे थेट आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव दिला आहे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसीत घुसखोरी करण्यासंदर्भात जाहीर सभेत खरमरीत समाचार घेतला. बीड दौऱ्यावर, गेवराईतील शृंगारवाडी येथे काल ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनादरम्यान त्यांनी मनोज जरांगे पाटील यांवर निशाणा साधला.

हाके यांनी जरांगेंना डिवचले


तुम्ही आता आमच्यात आले ना तर अकरा विवाह तुमच्या आमच्यात करून त्या आधी जाहीर करा, हाके यांनी असे बोलत थेट जरांगेंना डिवचल्याचे दिसून आले. लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही ९६ कुळी, मराठा, क्षत्रिय! आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय. हे मी बोललो नाही बरं का, ते हे स्वर्गीय एनडी पाटील बोलायचे. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले असल्याचे म्हणत हाके यांनी जरांगे पाटलांना लक्ष केले.

यावेळी बोलताना हाकेंनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचे दिसून आले. अजित दादा मी गाजत वाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन मनोज जलांगे यांचा देखील समाचार घेतला.

पुढे बोलताना हाकेंनी आज बीड जिल्ह्यातील मराठा लोकप्रतिनिधींवरदेखील निशाणा साधल्याचे दिसून आले. गेवराईचा आमदार जातीवादी आहे. असे म्हणत त्यांनी चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती? असे म्हणत खासदारावरही टीका केली.

हाके यांच्या या जोरदार टिकेनंतर जरांगे पाटील त्यांना काय प्रतिक्रिया देतायत? यावर मराठा आणि ओबीसी यांच्यातील आरक्षण वाद अवलंबून असणार आहे.

 
Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु