बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ‘टाईम-क्लॉक’ प्रणालीची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. या प्रणालीनुसार, एका रॅलीनंतर खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ कंदांत तयार व्हावे लागेल. २० नोव्हेंबरपासून निवडक वर्ल्ड टूर स्पर्धांमध्ये या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.


हे नियम २०२६ पर्यंत सुरू राहतील आणि त्यांचा अधिक विस्तृतपणे वापर केला जाईल. ‘बीडब्ल्यूएफ’ने एका निवेदनात म्हटले आहे की, या नियमांमुळे ‘बीडब्ल्यूएफ’ला ‘टाईम-क्लॉक’ची चाचणी सुरू ठेवता येईल, ज्यात खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ सेकंदांत तयार राहावे लागेल. या प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय महासंघांना त्यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचार्यांसोबत अंतर्गत चाचणी घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, स्टेकहोल्डर्सकडून अभिप्राय घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.


डेटाचे विश्लेषण
‘बीडब्ल्यूएफ’ने अनेक सामन्यांच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर हा २५ सेकंदांचा नियम निश्चित केला आहे. या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, सामन्यांमध्ये कमीत कमी व्यत्यय आल्यास, रॅलींमधील सरासरी वेळ २२ सेकंद असतो, तर एका रॅलीची सरासरी वेळ नऊ सेकंद असते. ‘बीडब्ल्यूएफ’चा विश्वास आहे की, २५ सेकंदांची ही मर्यादा खेळाडूंना पुरेसा आराम आणि खेळाचे सातत्य राखण्यासाठी योग्य संतुलन साधेल.


नियमांचे तपशील
२५ सेकंदांची मर्यादा : प्रत्येक रॅलीनंतर खेळाडूंना २५ सेकंदांचा अवधी दिला जाईल. ही वेळ पंचांनी स्कोअर अपडेट केल्यावर सुरू होईल.
सर्व्हर आणि रिसीव्हर : २५ सेकंदांच्या आत सर्व्हरने सर्व्हिससाठी तयार असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सर्व्हरने सर्व्हिससाठी स्थान घेतल्यावर रिसीव्हरनेही तयार असणे बंधनकारक आहे.
पंचांचे अधिकार : वैद्यकीय उपचार किंवा बॅडमिंटन कोर्टच्या देखभालीसारख्या विशेष परिस्थितीत पंचांना अधिक वेळ देण्याचा अधिकार असेल.
खेळाडूंचे स्वातंत्र्य : खेळाडूंना टॉवेल घेणे, पाणी पिणे किंवा स्वतःवर कोल्ड स्प्रे वापरणे यांसारखे सामान्य क्रियाकलाप करण्यासाठी पंचांची परवानगी घेण्याची गरज नाही, जोपर्यंत ते २५ सेकंदांच्या आत सर्व्हिस/रिसीव्ह करण्यासाठी तयार असतील.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए