बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन) ‘टाईम-क्लॉक’ प्रणालीची चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे. या प्रणालीनुसार, एका रॅलीनंतर खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ कंदांत तयार व्हावे लागेल. २० नोव्हेंबरपासून निवडक वर्ल्ड टूर स्पर्धांमध्ये या नियमाची अंमलबजावणी सुरू होईल.


हे नियम २०२६ पर्यंत सुरू राहतील आणि त्यांचा अधिक विस्तृतपणे वापर केला जाईल. ‘बीडब्ल्यूएफ’ने एका निवेदनात म्हटले आहे की, या नियमांमुळे ‘बीडब्ल्यूएफ’ला ‘टाईम-क्लॉक’ची चाचणी सुरू ठेवता येईल, ज्यात खेळाडूंना पुढील रॅलीसाठी २५ सेकंदांत तयार राहावे लागेल. या प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय महासंघांना त्यांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचार्यांसोबत अंतर्गत चाचणी घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, स्टेकहोल्डर्सकडून अभिप्राय घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.


डेटाचे विश्लेषण
‘बीडब्ल्यूएफ’ने अनेक सामन्यांच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर हा २५ सेकंदांचा नियम निश्चित केला आहे. या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, सामन्यांमध्ये कमीत कमी व्यत्यय आल्यास, रॅलींमधील सरासरी वेळ २२ सेकंद असतो, तर एका रॅलीची सरासरी वेळ नऊ सेकंद असते. ‘बीडब्ल्यूएफ’चा विश्वास आहे की, २५ सेकंदांची ही मर्यादा खेळाडूंना पुरेसा आराम आणि खेळाचे सातत्य राखण्यासाठी योग्य संतुलन साधेल.


नियमांचे तपशील
२५ सेकंदांची मर्यादा : प्रत्येक रॅलीनंतर खेळाडूंना २५ सेकंदांचा अवधी दिला जाईल. ही वेळ पंचांनी स्कोअर अपडेट केल्यावर सुरू होईल.
सर्व्हर आणि रिसीव्हर : २५ सेकंदांच्या आत सर्व्हरने सर्व्हिससाठी तयार असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सर्व्हरने सर्व्हिससाठी स्थान घेतल्यावर रिसीव्हरनेही तयार असणे बंधनकारक आहे.
पंचांचे अधिकार : वैद्यकीय उपचार किंवा बॅडमिंटन कोर्टच्या देखभालीसारख्या विशेष परिस्थितीत पंचांना अधिक वेळ देण्याचा अधिकार असेल.
खेळाडूंचे स्वातंत्र्य : खेळाडूंना टॉवेल घेणे, पाणी पिणे किंवा स्वतःवर कोल्ड स्प्रे वापरणे यांसारखे सामान्य क्रियाकलाप करण्यासाठी पंचांची परवानगी घेण्याची गरज नाही, जोपर्यंत ते २५ सेकंदांच्या आत सर्व्हिस/रिसीव्ह करण्यासाठी तयार असतील.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील