‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी चित्रपट ‘तू माझा किनारा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. कुटुंब, नातेसंबंध आणि बदलत्या पालकत्त्वावर आधारित असलेला हा चित्रपट आजच्या धावपळीच्या युगात माणसामाणसांतील नात्यांची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा ठरेल, असा विश्वास स्टीफन यांनी व्यक्त केला आहे.


या चित्रपटामागील प्रेरणेबद्दल बोलताना स्टीफन म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाचे जीवन खूप वेगवान झाले आहे. आपण आपल्या प्रियजनांना वेळ देणे विसरतो. या कथेद्वारे आपण आधार, जबाबदारी आणि प्रेम या मूल्यांची आठवण करून देत आहोत. पालक आपल्या मुलांसाठी भिंतसुद्धा असावेत आणि नायकसुद्धा."


सुरुवातीला हा चित्रपट मल्याळम भाषेत करण्याची कल्पना होती, मात्र स्टीफन यांना वाटले की ही कथा मराठी संस्कृतीशी अधिक सुसंगत आहे. "इथले नातेसंबंध, कुटुंबातील जिव्हाळा आणि मूल्ये खूप खोलवर आहेत. म्हणून हा चित्रपट मराठीत बनवायचा निर्णय घेतला," असे ते म्हणाले.



"जर आशय चांगला असेल, तर प्रेक्षक नक्कीच जोडले जातील"


'तू माझा किनारा' हा चित्रपट एक मजबूत भावनिक कथा सांगतो. स्टीफन यांना विश्वास आहे की प्रेक्षक नक्कीच या चित्रपटाशी जोडले जातील. "पालकत्वावर आधारित चित्रपट मराठीत फारसे बघायला मिळत नाहीत. ही कथा प्रत्येकाच्या आयुष्यातील वास्तव आहे, त्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनाला भिडेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


स्टीफन यांनी चित्रपटाच्या संगीताबद्दल आणि निर्मिती मूल्यांबद्दलही समाधान व्यक्त केले. "ही एक चांगली कथा आहे, उत्तम संगीत आहे आणि technically ही एक दर्जेदार निर्मिती आहे. त्यामुळे मला वाटतं की हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरेल," असे ते ठामपणे म्हणाले.


‘तू माझा किनारा’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर आजच्या धकाधकीच्या जीवनात हरवलेल्या नात्यांची आठवण करून देणारा एक भावनिक अनुभव आहे.

Comments
Add Comment

बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने

बँड बाजा बारातपासून धुरंधरपर्यंत: रणवीरचा अविस्मरणीय चित्रपट प्रवास

हिंदी सिनेमाला नवी दिशा देणारा अभिनेता: रणवीरच्या यशाची १५ वर्षांची गाथा गेल्या १५ वर्षांपासून रणवीर सिंग हे

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री

Dhurandhar Viral Song : "अक्षय शूटिंगदरम्यान छोटा सिलेंडर घेऊनच फिरत होता";कोरिओग्राफरने सांगितला किस्सा

  मुंबई : अक्षयचे एन्ट्री सॉन्ग असलेले 'FA9LA,बहरीनच्या हिप-हॉप स्टार फ्लिपराची याने बनवले आहे,तर या गाण्याची

Dhurandhar viral Dance Step : अक्षय खन्नाने अख्खं मार्केट गाजवलं! अक्षय खन्नाला कशी सुचली ही डान्स स्टेप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याने धूरंधर या चित्रपटात फ्लिपराचीचं गाणं 'Fa9la' मध्ये आपल्या व्हायरल डान्स

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची