TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं नाव अग्रेसर ठरतं. २००८ साली निर्माता असित मोदी यांनी सुरू केलेली ही मालिका तब्बल १७ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेने इतिहास रचत ४५०० भाग पूर्ण केले असून, भारतातील सर्वाधिक काळ चालणारी सिटकॉम मालिका बनली आहे.



‘तारक मेहता’ परिवारात जल्लोष


४५०० भाग पूर्ण केल्यानंतर या विशेष टप्प्याचा आनंद साजरा करण्यासाठी ‘तारक मेहता’ परिवार एकत्र आला. या सोहळ्यात लेखन, तांत्रिक विभाग, सेट डिझायनिंग आणि प्रोडक्शन स्टाफ अशा सर्व पाठीमागे काम करणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. जवळपास दोन दशकं या मालिकेची लोकप्रियता टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक हातामागे असलेलं श्रम आणि समर्पण याचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी निर्माता असित मोदी यांनी संपूर्ण टीमसोबत केक कापून आनंद व्यक्त केला.


असित मोदी म्हणाले, “ही यशोगाथा केवळ आमच्या टीमची नाही, तर सुरुवातीपासून आमच्यासोबत असलेल्या प्रत्येकाची आहे. खरी ताकद म्हणजे ते सर्व लोक, ज्यांच्या मेहनतीमुळेच हा शो इतका पुढे पोहोचला आहे. मी कलाकार, टीम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथवर आलो आहोत.”



गिनीज बुकमध्ये दोनदा नोंद


‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर विक्रमांच्या पुस्तकातही आपली छाप सोडली आहे. या मालिकेचं नाव दोन वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. २०२१ साली भारतातील सर्वाधिक काळ चालणा-या सिटकॉम मालिकेचा मान मिळाला, तर २ जुलै २०२२ रोजी मालिकेने ३५०० भाग पूर्ण करत आणखी एकदा गिनीज बुकमध्ये स्थान मिळवलं. यापूर्वी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही या मालिकेने आपली नोंद केली होती.


Comments
Add Comment

लवकरच केदार शिंदेंचा 'हा' स्त्रीप्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मराठी सिनेविश्वात स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळीच ओळख मिळवून देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा

नवऱ्याचं कौतुकचं नाही, अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मिडियावर ट्रोल

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर 2 सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत

अभिनेत्री अनुष्का शर्मा ८ वर्षांनी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार ?

अभिनेत्री अनुष्का शर्मानं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, बॉलिवूडच्या तिन्ही

The 50 शो जिंकूनही शिव ठाकरेनं गमावलं ५० लाखाचं बक्षिस

शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता

अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा' इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं

अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला...

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच,