मानुनी घे गोड तुझी रंगपूजा... ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार या परंपरेला ‘दशावतार’ या सिनेमात अनोख्या पद्धतीने सादर केले आहे. ‘रंगपूजा’ ही या सिनेमातली भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली असून ती पसंतीसही उतरत आहे. अजय गोगावलेचा आर्त स्वर, गुरू ठाकूरची अप्रतिम शब्दरचना आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र याची सुमधुर चाल यामुळे भैरवीला दर्जा प्राप्त झालाय. भैरवीला मिळालेला उत्तम प्रतिसाद सुखावणारा असल्याचे मत दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी व्यक्त केले.


एका कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना गाण्यातून मांडली आहे. सिनेमातली भैरवी म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरू ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकूट प्रथमच या गाण्यात एकत्र आले आहेत.


या भैरवीविषयी अजय म्हणाला, ‘दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्त्व आहे तितकेच 'रंगपूजा' या भैरवीलाही आहे. भैरवी झाल्याशिवाय नाटकातला कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच 'दशावतार' चित्रपटातली 'रंगपूजा' ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गीतकार गुरू म्हणाले की, ‘कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेला. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो, माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो, तेव्हा मी आश्वस्त होतो. अजयने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा अक्षरशः हळवे झाल्याचे गुरू यांनी सांगितले.’

Comments
Add Comment

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या

सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज