मानुनी घे गोड तुझी रंगपूजा... ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार या परंपरेला ‘दशावतार’ या सिनेमात अनोख्या पद्धतीने सादर केले आहे. ‘रंगपूजा’ ही या सिनेमातली भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली असून ती पसंतीसही उतरत आहे. अजय गोगावलेचा आर्त स्वर, गुरू ठाकूरची अप्रतिम शब्दरचना आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र याची सुमधुर चाल यामुळे भैरवीला दर्जा प्राप्त झालाय. भैरवीला मिळालेला उत्तम प्रतिसाद सुखावणारा असल्याचे मत दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी व्यक्त केले.


एका कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना गाण्यातून मांडली आहे. सिनेमातली भैरवी म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरू ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकूट प्रथमच या गाण्यात एकत्र आले आहेत.


या भैरवीविषयी अजय म्हणाला, ‘दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्त्व आहे तितकेच 'रंगपूजा' या भैरवीलाही आहे. भैरवी झाल्याशिवाय नाटकातला कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच 'दशावतार' चित्रपटातली 'रंगपूजा' ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गीतकार गुरू म्हणाले की, ‘कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेला. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो, माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो, तेव्हा मी आश्वस्त होतो. अजयने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा अक्षरशः हळवे झाल्याचे गुरू यांनी सांगितले.’

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी