मानुनी घे गोड तुझी रंगपूजा... ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार या परंपरेला ‘दशावतार’ या सिनेमात अनोख्या पद्धतीने सादर केले आहे. ‘रंगपूजा’ ही या सिनेमातली भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली असून ती पसंतीसही उतरत आहे. अजय गोगावलेचा आर्त स्वर, गुरू ठाकूरची अप्रतिम शब्दरचना आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र याची सुमधुर चाल यामुळे भैरवीला दर्जा प्राप्त झालाय. भैरवीला मिळालेला उत्तम प्रतिसाद सुखावणारा असल्याचे मत दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी व्यक्त केले.


एका कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना गाण्यातून मांडली आहे. सिनेमातली भैरवी म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरू ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकूट प्रथमच या गाण्यात एकत्र आले आहेत.


या भैरवीविषयी अजय म्हणाला, ‘दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्त्व आहे तितकेच 'रंगपूजा' या भैरवीलाही आहे. भैरवी झाल्याशिवाय नाटकातला कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच 'दशावतार' चित्रपटातली 'रंगपूजा' ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गीतकार गुरू म्हणाले की, ‘कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेला. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो, माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो, तेव्हा मी आश्वस्त होतो. अजयने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा अक्षरशः हळवे झाल्याचे गुरू यांनी सांगितले.’

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय