महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमुळे कपनीला यश मिळाले असल्याचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश  चंद्र यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या क्रमवारीत, महावितरणला १०० पैकी ९३ गुण मिळाले आहेत आणि या कामगिरीमुळे या कंपनीला देशात पहिले स्थान मिळाले आहे. 

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, "हे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनामुळेच आहे." तसेच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हंटले की, ही कामगिरी संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आयसी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडियाने हे क्रमवारी तयार केली. पश्चिम भारतातील महावितरण राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १०० पैकी ९३ गुणांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे व राज्याला ए मानांकन मिळाले आहे.

देशातील मानांकनामध्ये ८५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या राज्यांचा ए गटात समावेश केला असून त्यामध्ये महाराष्ट्रासह एकूण ८ राज्ये आहेत. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश (८४.५ गुण), गोवा (७४ गुण), दादरा, नगर हवेली आणि दीव दमण (७४ गुण), गुजरात (६७ गुण) व छत्तीसगड (५२ गुण) यांचा क्रमांक लागतो. मानांकन निश्चित करण्यासाठी पाच निकष ठरविण्यात आले होते. त्यापैकी संसाधन पर्याप्तता (३२ पैकी ३२ गुण), ऊर्जा परिवर्तन (१५ पैकी १५ गुण) व नियामकाच्या अनुषंगाने प्रशासन (५ पैकी ५) या तीन घटकात महावितरणला पैकीच्या पैकी गुण मिळाले.

महावितरणच्या यशामागे अनेक प्रमुख ऊर्जा सुधारणा योजनांचा हात आहे. विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ३.०, ज्या अंतर्गत १६ हजार मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविला जात आहे. याशिवाय, राज्यात देशात प्रथमच एक व्यापक ऊर्जा परिवर्तन योजना तयार करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ४५ हजार मेगावॅट वीज खरेदी करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

महावितरणचा दावा आहे की अक्षय ऊर्जेवर भर दिल्याने पुढील पाच वर्षांत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि यामुळे वीज दरही कमी होतील. यासोबतच, आरएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे. या सर्व सुधारणा आणि चांगल्या सेवेमुळे, महावितरणला देशभरातील रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात राज्याची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजप-शिंदे गटाची जोरदार मुसंडी! भाजप ११, तर शिंदे गट १० जागांवर आघाडीवर

११४ च्या मॅजिक फिगरकडे महायुतीची वेगाने वाटचाल मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 'किल्ला' काबीज करण्यासाठी मैदानात

मुंबईत मतमोजणीला सुरुवात, अशी सुरू आहे मतमोजणी ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

मुंबई मनपासाठी ५२.९४ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी एकूण ५२.९४ टक्के

पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान

मुंबईत काही अपवाद वगळता शांततेत मतदान

तब्बल १ हजार ७०० उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य