महावितरण पहिल्या क्रमांकावर, केंद्राच्या क्रमवारीत १०० पैकी मिळाले ९३ गुण

मुंबई : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या क्रमवारीत महावितरणने १०० पैकी ९३ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने केलेल्या कामगिरीमुळे कपनीला यश मिळाले असल्याचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश  चंद्र यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) ने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या क्रमवारीत, महावितरणला १०० पैकी ९३ गुण मिळाले आहेत आणि या कामगिरीमुळे या कंपनीला देशात पहिले स्थान मिळाले आहे. 

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबद्दल आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, "हे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनामुळेच आहे." तसेच त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना म्हंटले की, ही कामगिरी संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आयसी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडियाने हे क्रमवारी तयार केली. पश्चिम भारतातील महावितरण राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १०० पैकी ९३ गुणांसह महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे व राज्याला ए मानांकन मिळाले आहे.

देशातील मानांकनामध्ये ८५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या राज्यांचा ए गटात समावेश केला असून त्यामध्ये महाराष्ट्रासह एकूण ८ राज्ये आहेत. महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्य प्रदेश (८४.५ गुण), गोवा (७४ गुण), दादरा, नगर हवेली आणि दीव दमण (७४ गुण), गुजरात (६७ गुण) व छत्तीसगड (५२ गुण) यांचा क्रमांक लागतो. मानांकन निश्चित करण्यासाठी पाच निकष ठरविण्यात आले होते. त्यापैकी संसाधन पर्याप्तता (३२ पैकी ३२ गुण), ऊर्जा परिवर्तन (१५ पैकी १५ गुण) व नियामकाच्या अनुषंगाने प्रशासन (५ पैकी ५) या तीन घटकात महावितरणला पैकीच्या पैकी गुण मिळाले.

महावितरणच्या यशामागे अनेक प्रमुख ऊर्जा सुधारणा योजनांचा हात आहे. विशेषतः मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ३.०, ज्या अंतर्गत १६ हजार मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविला जात आहे. याशिवाय, राज्यात देशात प्रथमच एक व्यापक ऊर्जा परिवर्तन योजना तयार करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ४५ हजार मेगावॅट वीज खरेदी करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

महावितरणचा दावा आहे की अक्षय ऊर्जेवर भर दिल्याने पुढील पाच वर्षांत ६६ हजार कोटी रुपयांची बचत होईल आणि यामुळे वीज दरही कमी होतील. यासोबतच, आरएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे. या सर्व सुधारणा आणि चांगल्या सेवेमुळे, महावितरणला देशभरातील रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात राज्याची विश्वासार्हता आणखी मजबूत झाली आहे.
Comments
Add Comment

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

नेव्हल परिसरातील रायफल चोरी प्रकरणात ट्विस्ट; आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना ओळखतात

मुंबई: मुंबई पोलीस गुन्हे शाखेने 'नेवी नगर रायफल चोरी' प्रकरणाच्या तपासात एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. आरोपी

तुमच्याकडे गाडी आहे का? तर हे जरूर वाचा...

सीएटने सर्व टायरच्या किमती केल्या कमी मुंबई : भारत सरकारने अ

पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, एसटीच्या ७५ बसस्थानकावर 'मोफत वाचनालय'

मुंबई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त एसटीच्या ७५ प्रमुख बस

७/११ बॉम्बस्फोटात निर्दोष सुटका झालेल्या व्यक्तीची चुकीच्या कारावासासाठी भरपाईची मागणी

मुंबई: ७/११ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोटात २०१५ मध्ये निर्दोष सुटका झालेली एकमेव व्यक्ती, अब्दुल वाहिद शेख