पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि सुलतानपूरमधील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये तातडीची मदत पोहोचवण्यासाठी 'रिलायन्सची मदत चमू कार्यरत आहे. अनेक कुटुंबांनी आपली घरे, उपजीविका गमावली आहे. रिलायन्स परिवार त्यांच्यासोबत आहे.अन्न, पाणी, माणसांबरोबरच प्राण्यांचीही काळजी घेतआहे,असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी, म्हंटले आहे.


दहा हजारहून अधिक कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटण्यात आले आहे. अत्यंत असुरक्षित अशा एक हजार कुटुंबांसाठी तसेच ,विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबून असलेल्या नेतृत्वाखालील कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपयाचे व्हाउचर-आधारित सहाय्य केले जात आहे.सामुदायिक स्वयंपाकगृहांसाठी कोरड्या अन्नधान्याचा पुरवठा केला.पाणथळ भागांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी पूरवण्यासाठी अस्थायी वॉटर फिल्टरची उभारणी केली.


निवऱ्यासाठी विस्थापित कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, ग्राउंडशीट्स, डासजाळी, दोऱ्या आणि बिछाना असलेली आपत्कालीन निवारा किट्स वाटली असून पूरानंतर होणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य-जागरुकता सत्रे आणि पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि वनतारा आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधे, लसीकरण आणि तसेच पशुधन शिबिरे आयोजित करत आहेत आणि मृत प्राण्यांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार करून संभाव्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. रिलायन्सच मदत चमू जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायत यांच्या समन्वयाने तातडीची जीवनरक्षक मदत पोहोचवत आहे. ‘जिओ’च्या पंजाब टीमने एनडीआरएफच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात नेटवर्क सुस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून राज्यभर १००% विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी केली असल्याचे अनंत अंबानी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना