पूरग्रस्त पंजाबमध्ये ‘रिलायन्स’ची दहा सूत्री मदतयोजना

मुंबई : पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्सने येथे व्यापक दहा सूत्री मदतयोजना सुरू केली आहे. अमृतसर आणि सुलतानपूरमधील सर्वाधिक प्रभावित गावांमध्ये तातडीची मदत पोहोचवण्यासाठी 'रिलायन्सची मदत चमू कार्यरत आहे. अनेक कुटुंबांनी आपली घरे, उपजीविका गमावली आहे. रिलायन्स परिवार त्यांच्यासोबत आहे.अन्न, पाणी, माणसांबरोबरच प्राण्यांचीही काळजी घेतआहे,असे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक अनंत अंबानी, म्हंटले आहे.


दहा हजारहून अधिक कुटुंबांना आवश्यक अन्नधान्य वाटण्यात आले आहे. अत्यंत असुरक्षित अशा एक हजार कुटुंबांसाठी तसेच ,विधवा महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांवर अवलंबून असलेल्या नेतृत्वाखालील कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपयाचे व्हाउचर-आधारित सहाय्य केले जात आहे.सामुदायिक स्वयंपाकगृहांसाठी कोरड्या अन्नधान्याचा पुरवठा केला.पाणथळ भागांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी पूरवण्यासाठी अस्थायी वॉटर फिल्टरची उभारणी केली.


निवऱ्यासाठी विस्थापित कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री, ग्राउंडशीट्स, डासजाळी, दोऱ्या आणि बिछाना असलेली आपत्कालीन निवारा किट्स वाटली असून पूरानंतर होणाऱ्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य-जागरुकता सत्रे आणि पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशन आणि वनतारा आणि पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने औषधे, लसीकरण आणि तसेच पशुधन शिबिरे आयोजित करत आहेत आणि मृत प्राण्यांचे सन्मानपूर्वक वैज्ञानिक अंत्यसंस्कार करून संभाव्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जात आहे. रिलायन्सच मदत चमू जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पंचायत यांच्या समन्वयाने तातडीची जीवनरक्षक मदत पोहोचवत आहे. ‘जिओ’च्या पंजाब टीमने एनडीआरएफच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात नेटवर्क सुस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून राज्यभर १००% विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी केली असल्याचे अनंत अंबानी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Vande Bharat Sleeper Train Route : ठरलं! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन ‘या’ मार्गावर धावणार; प्रवाशांची प्रतीक्षा संपली!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाने आता एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर'

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या