Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल


मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळूरमधील ‘शिवाजीनगर मेट्रो स्टेशन’चे नाव बदलून ‘सेंट मेरी’ करण्याची मागणी काँग्रेस आमदार रिझवान यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाठिंबा देत, नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेमुळे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.


?si=N6vEzRI2BdWPQue0

चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर थेट हल्ला


भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "पुन्हा एकदा काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष उफाळून आला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. कर्नाटक काँग्रेसने केलेल्या या कृतीवर महाराष्ट्र काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.


"महाराष्ट्रातील काँग्रेस आता तरी आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्प बसणार?" असा जळजळीत सवाल त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असलेले त्यांचे मित्रपक्ष, विशेषतः त्यांच्यावर टीका करणारे, आता या अपमानावर गप्प का आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. "उबाठा गटाला डिवचत त्यांनी म्हटले की, इथले त्यांचे मित्रपक्ष आहेत... त्यांचा स्वयंघोषित विश्वगुरू रडत रौत अजून गप्प कसे?" असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.



राजकीय वादळ आणि महाराष्ट्रातील शांतता


कर्नाटक सरकारमधील या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पक्षांनी या अपमानावर गप्प राहणे, ही गंभीर बाब आहे. भाजपचा आरोप आहे की, कर्नाटक काँग्रेसने केलेला हा अपमान महाराष्ट्रातील काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना मान्य आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं.


सध्या तरी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हा मुद्दा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा रंगतदार संघर्ष निर्माण करणार, यात शंका नाही.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये