नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?


पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर थोड्याच वेळात विमानतळावरुन पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असे सूत्रांकडून समजते. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.


पनवेल ते उलवे दरम्यान ११०० हेक्टरवर पसरलेला ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. विमानतळावरील अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत. या विमानतळाच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफच्या जवानांकडे असेल. उद्घाटनानंतर सुरुवातीला या विमानतळावरुन इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सच्या विमानसेवा सुरू होतील. लवकरच इतर कंपन्यांच्या विमान सेवांनाही सुरुवात होणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भातील ठराव राज्य विधिमंडळाने दोन वेळा मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण केंद्राचा निर्णय अद्याप आलेला नाही. आता उद्घाटनाच्या दिवशी किंवा त्याआधी तरी विमानतळाच्या नावाबाबत काही घोषणा होते का याकडे अनेकांचे लक्ष आहे.


दि. बा. पाटील यांची लोकनेते अशी ओळख आहे. नवी मुंबईतील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तसेच साडेबारा टक्के भूखंडासाठी दि. बा. पाटील यांनी संघर्ष केल्यामुळे हा नियम देशभरात लागू करण्यात आला. देशातील प्रकल्पग्रस्तांना दिबांच्या संघर्षामुळे फायदा झाला. त्यामुळे दिबांचे नाव विमानतळाला देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.


Comments
Add Comment

Nepal Violence : नेपाळमधून १५,००० कैदी फरार! भारत-नेपाळ सीमेवर तणावाचं वातावरण

नेपाळ : नेपाळमध्ये गेल्या चार दिवसांपासून भीषण अशांतता आणि हिंसाचार सुरू आहे. सरकारने अचानक काही लोकप्रिय सोशल

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

मुंबईतील हजारो इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राबाबत मोठी घोषणा

मुंबई : राज्यात दिवाळीनंतर मुंबई ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या स्थानिक

Chitra Wagh : शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना रडत रौत अजून गप्प कसे?

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर चित्रा वाघ यांचा हल्लाबोल मुंबई : कर्नाटक राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी - ग्राहकांची १३ सप्टेंबरला गैरसोय होणार 'या' वेळात बंद राहतील नेट बँकिंग सेवा जाणून घ्या एका क्लिकवर

प्रतिनिधी:एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी पुढे आली आहे. १३ सप्टेंबरला बँकेच्या ग्राहकांना गैरसोय

शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

मुंबई : शिवाजीनगरचं नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला आहे. काँग्रेसच्या या