नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?


पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर थोड्याच वेळात विमानतळावरुन पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असे सूत्रांकडून समजते. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.


पनवेल ते उलवे दरम्यान ११०० हेक्टरवर पसरलेला ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. विमानतळावरील अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत. या विमानतळाच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफच्या जवानांकडे असेल. उद्घाटनानंतर सुरुवातीला या विमानतळावरुन इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सच्या विमानसेवा सुरू होतील. लवकरच इतर कंपन्यांच्या विमान सेवांनाही सुरुवात होणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भातील ठराव राज्य विधिमंडळाने दोन वेळा मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण केंद्राचा निर्णय अद्याप आलेला नाही. आता उद्घाटनाच्या दिवशी किंवा त्याआधी तरी विमानतळाच्या नावाबाबत काही घोषणा होते का याकडे अनेकांचे लक्ष आहे.


दि. बा. पाटील यांची लोकनेते अशी ओळख आहे. नवी मुंबईतील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तसेच साडेबारा टक्के भूखंडासाठी दि. बा. पाटील यांनी संघर्ष केल्यामुळे हा नियम देशभरात लागू करण्यात आला. देशातील प्रकल्पग्रस्तांना दिबांच्या संघर्षामुळे फायदा झाला. त्यामुळे दिबांचे नाव विमानतळाला देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.


Comments
Add Comment

भाजपाध्यक्ष राज्यसभेवर जाणार, भाजपचे राज्यसभेचे नऊ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने बिहारमधून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ