दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय

वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न


भाईंदर (वार्ताहर) : दहिसर चेक नाक्यावरील टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना करूनही वाहतूक कोंडीत फरक पडला नाही त्यामुळे इंधनाचा अपव्यय, वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी यावर आता दहिसर टोल नाका तेथून २ किलोमीटर पुढे स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची तसेच सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


टोल नाक्यामुळे रोज दिवसभर तर सकाळ संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना केल्या परंतु काहीच फरक पडला नाही. त्यामुळे सदर टोल नाका दोन किलोमीटर पुढे नेण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. बैठकीत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, टोल ठेकेदार विरेंद्र म्हैसकर इतर अधिकारी उपस्थित होते त्यात टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या