दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२५ : सिनेसृष्टीचा १० वर्षांचा प्रवास होणार मुंबईत साजरा!

मुंबई : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (DPIFF) २०२५ हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या दहाव्या वर्षाचा गौरव साजरा करणारा एक खास सोहळा असणार आहे. भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे धुंडिराज गोविंद फाळके यांना श्रद्धांजली अर्पण करत हा महोत्सव दरवर्षी पार पडतो. DPIFF हा देशातील एक मानाचा आणि लोकप्रिय चित्रपट पुरस्कार समारंभ ठरला आहे, ज्यामध्ये मोठे कलाकार आणि नवीन चेहऱ्यांना एकाच मंचावर सन्मानित केले जाते.


याआधी २०२४ मध्ये झालेला DPIFF पुरस्कार सोहळा खूपच चर्चेत होता. शाहरुख खान, करीना कपूर खान, नयनतारा, राणी मुखर्जी, शाहिद कपूर यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा सोहळा केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो सिनेसृष्टीतील कला, मेहनत, आणि प्रतिभेचा एक भव्य उत्सव असतो. दरवर्षी यामध्ये कलाकारांसोबतच सरकारी अधिकारी, चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अनेक मान्यवर सहभागी होतात.


दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यानंदाचे १०वे वर्ष आहे , या वेळी हा सोहळा आणखी भव्य आणि आकर्षक असणार आहे. भारतातील विविध भागांतील कथा, चित्रपट, गाणी आणि कलाकारांचा गौरव या मंचावर केला जाणार आहे. या सोहळ्यात ग्लोबल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल देखील आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये जगभरातील तरुण आणि नवोदित चित्रपट निर्माते सहभागी होणार आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी काही आंतरराष्ट्रीय कलाकार आणि व्यक्तीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. DPIFF चे सीईओ अभिषेक मिश्रा म्हणाले, “आपण दहाव्या वर्षात प्रवेश करत आहोत आणि यंदाचा महोत्सव हा केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक चित्रपटसृष्टीतील एक संस्मरणीय क्षण ठरणार आहे.” हा महोत्सव २९ आणि ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत पार पडणार आहे . हा सोहळा सिनेसृष्टीतील कला, कथा आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा एक सुंदर संगम असणार आहे.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी