मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर

पक्षाला यश मिळण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कंबर कसली


मुंबई (प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आलेली आहे. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यात पक्षाला यश मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.


अलीकडेच शिवसेनेने मुंबईतील विविध प्रभागातील प्रभारी विभाग प्रमुख व प्रभारी विधानसभा प्रमुखाच्या नियुक्त्या केल्या होत्या. मुंबई पालिकेत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. ६० हून अधिक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून काही दिवसांत आणखी माजी नगरसेवक प्रवेश करतील असा दावा नेते करत आहेत. पालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची सत्ता राहिली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच पालिका निवडणुकीत ठाकरे व शिंदे हे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत.



अशी असेल शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती


१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते २) रामदास कदम, नेते ३) गजानन कीर्तिकर, नेते ४) आनंदराव अडसूळ, नेते ५) मीनाताई कांबळे, नेत्या ६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ७) रवींद्र वायकर, खासदार ८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार ९) राहुल शेवाळे, माजी खासदार १०) संजय निरुपम, माजी खासदार ११) प्रकाश सुर्वे, आमदार १२) अशोक पाटील, आमदार १३) मुरजी पटेल, आमदार १४) दिलीप लांडे, आमदार १५) तुकाराम काते, आमदार १६) मंगेश कुडाळकर, आमदार १७) श्रीमती मनीषा कायंदे, विधान परिषद, आमदार १८) सदा सरवणकर, माजी आमदार १९) यामिनी जाधव, माजी आमदार २०) दीपक सावंत, माजी आमदार २१) शिशिर शिंदे, माजी आमदार.

Comments
Add Comment

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री