Air India flight : सिंगापूर फ्लाइटमध्ये गोंधळ; २०० प्रवाशांना अचानक उतरवले विमानातून!

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात अजूनही ताजा असतानाच, एअर इंडियाच्या विमानांमधील सातत्याने येणारे तांत्रिक बिघाड आता चिंतेचा विषय ठरत आहेत. अहमदाबाद दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला, तर उर्वरित सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी चेन्नई विमानतळावरही एअर इंडियाच्या एका विमानाची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली होती. प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाल्याने ही घटना चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, नुकतीच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीहून सिंगापूरला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातही तांत्रिक बिघाड झाल्याचे समजते. या घटनेमुळे प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.



सिंगापूर फ्लाइटमधून २०० प्रवाशांना उतरवलं


सिंगापूरला जाणाऱ्या या विमानात तब्बल २०० हून अधिक प्रवासी दोन तासांहून अधिक काळ बसून होते, मात्र अचानक सर्वांना विमानातून उतरवण्यात आले.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीहून सिंगापूरकडे रवाना होणार होते. प्रवासी आपापल्या जागांवर बसल्यानंतर अचानक कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षिततेबाबत आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकताच अहमदाबाद ते लंडन या विमानाचा भीषण अपघात, त्याआधी चेन्नईतील आपत्कालीन लॅंडिंग, आणि आता दिल्लीतील ही घटना – प्रवाशांचा एअर इंडियावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



एअर इंडियाच्या विमानातील एसी बिघाड


सिंगापूरला जाणारे एअर इंडिया फ्लाइट AI२३८० काल रात्री ११ वाजता उड्डाण करण्याचे वेळापत्रक होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे विमान वेळेवर निघू शकले नाही. प्रवाशांना विमानात बसवण्यात आले, पण एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये गंभीर बिघाड झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. उष्णतेमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. तब्बल दोन तास प्रवासी विमानातच बसून राहिले, तरीही समस्या सुटत नव्हती. शेवटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना खाली उतरवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेची पुष्टी करताना एअर इंडियाकडून अधिकृत माहिती देण्यात आली. त्यांनी सांगितले की, एसी सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे ही कारवाई करावी लागली. विमानाच्या तांत्रिक तपासणीनंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले. या घटनेमुळे प्रवाशांचा त्रास तर झाला, पण त्याचसोबत एअर इंडियाच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर पुन्हा एकदा बोट ठेवले गेले आहे.



एअर कंडिशनिंग सिस्टीम ठप्प


विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टीमने काम करणे बंद केले, एवढेच नव्हे तर काही वेळ विमानातील लाईट्सही ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. सुमारे दोन तास प्रवासी विमानात बसून राहिले, पण समस्या सुटली नाही. शेवटी सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीकडे नेण्यात आले. याआधीच अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातापूर्वी प्रवाशांनी कुलिंग व्यवस्थित होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता दिल्लीतील या घटनेमुळे पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमान सुरक्षेवर आणि तांत्रिक देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एअर इंडियाकडून दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासणी सुरू असून समस्या सुटल्यावरच विमानाच्या पुढील प्रवासाचा निर्णय घेतला जाईल.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू