देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत आहेत. तसेच देशभरातील मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.९ वर्षे असल्याचे २०२३ सालच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस) या सांख्यिकी अहवालातून समोर आले आहे. २०२२ मध्ये हे वय २२.७ वर्षे होते.


१९९० पासून एसआरएस मार्फत दर सहा महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात मुलींच्या लग्नाचा डेटा गोळा केला जातो आणि त्यावरून सरासरी वय ठरवले जाते. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत अजूनही लक्षणीय संख्येने मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध राज्यांत लग्नाचे सरासरी वय वेगवेगळे असून, पश्चिम बंगालमध्ये हे वय २१.३ वर्षे तर जम्मू-काश्मीरमध्ये २६.३ वर्षे आहे.


२०१९ ते २०२३ या पाच वर्षांची आकडेवारी पाहता, २०१९ मध्ये मुलींचे सरासरी लग्नाचे वय २२.१, २०२० मध्ये २२.७, २०२१ मध्ये २२.५ आणि २०२२ मध्ये २२.७ वर्षे होते. ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलींच्या लग्नाच्या वयात सातत्याने वाढ होत असली तरी दोन्ही ठिकाणी मोठा फरक कायम आहे. २०२३ मध्ये ग्रामीण भागातील सरासरी वय २२.४ वर्षे तर शहरी भागात २४.३ वर्षे होते. २०२२ मध्ये हे वय अनुक्रमे २२.२ आणि २३.९ वर्षे होते.


२.१% मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी


या माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरावर, २.१% महिलांनी १८ वर्षांच्या आधी लग्न केले, २५% महिलांनी १८ ते २० वर्षांच्या दरम्यान लग्न केले आणि ७२.९% महिलांनी २१ किंवा त्याहून अधिक वयात लग्न केले. ग्रामीण भागात, संबंधित टक्केवारी अनुक्रमे २.५%, २८.१% आणि ६९.४% आहे, तर शहरी भागात ती अनुक्रमे १.२%, १७% आणि ८१.८% आहे. मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांच्या आधी लग्न करणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (६.३%) आणि सर्वात कमी केरळमध्ये (०.१%) आढळले.


अहवालात देशातील वैवाहिक स्थिती संदर्भातील आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.


अविवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित आहेत, ज्यात पुरुषांचे प्रमाण (५५.४%) महिलांपेक्षा (४५.३%) जास्त आहे. बिहारमध्ये अविवाहित लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक (५८.३%) आहे, तर तामिळनाडूमध्ये ती सर्वात कमी (४१.३%) आहे.


विवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ४५.९% लोक विवाहित आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (४९.०%) पुरुषांपेक्षा (४२.९%) जास्त आहे. विवाहित लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (५१.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (४०.२%) नोंदवली गेली.


विधवा/घटस्फोटित/वेगळे राहणारे : एकूण लोकसंख्येपैकी ३.६% लोक विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणारे आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (५.६%) पुरुषांपेक्षा (१.७%) जास्त आहे. विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणाऱ्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (६.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (१.५%) नोंदवली गेली

Comments
Add Comment

Agni-6 Missile : भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे जगभर खळबळ; ओडिशा किनारपट्टीवरून ‘अग्नी-6’ क्षेपणास्त्र चाचणीची चर्चा

ओडिशा : भारताने गुरुवारी (७ मे) सायंकाळी Odisha किनारपट्टीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) चाचणी केल्याची

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence

TVK crosses 118 mark : तमिळनाडूत थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक! एका झटक्यात फिरवला गेम, सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला

तमिळनाडू : तमिळनाडूच्या राजकीय मैदानातून एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सुरू

West Bengal Next Deputy CM : पश्चिम बंगालमध्ये सत्तेचा 'महाराष्ट्र पॅटर्न'! भाजप देणार दोन उपमुख्यमंत्री ? शुभेंदू अधिकारींकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला आहे. मिळालेल्या ताज्या

Mumbai-Bengaluru Superfast Train : प्रवाशांची प्रतीक्षा संपली! मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेनला हिरवा कंदील; लवकरच 'वंदे भारत स्लीपर'चीही शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी बुधवारी प्रवाशांना एक मोठी

Telangana Shocking Video : भररस्त्यात थरार! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या; व्हिडिओ पहा

तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना