देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत आहेत. तसेच देशभरातील मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.९ वर्षे असल्याचे २०२३ सालच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस) या सांख्यिकी अहवालातून समोर आले आहे. २०२२ मध्ये हे वय २२.७ वर्षे होते.


१९९० पासून एसआरएस मार्फत दर सहा महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात मुलींच्या लग्नाचा डेटा गोळा केला जातो आणि त्यावरून सरासरी वय ठरवले जाते. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत अजूनही लक्षणीय संख्येने मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध राज्यांत लग्नाचे सरासरी वय वेगवेगळे असून, पश्चिम बंगालमध्ये हे वय २१.३ वर्षे तर जम्मू-काश्मीरमध्ये २६.३ वर्षे आहे.


२०१९ ते २०२३ या पाच वर्षांची आकडेवारी पाहता, २०१९ मध्ये मुलींचे सरासरी लग्नाचे वय २२.१, २०२० मध्ये २२.७, २०२१ मध्ये २२.५ आणि २०२२ मध्ये २२.७ वर्षे होते. ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलींच्या लग्नाच्या वयात सातत्याने वाढ होत असली तरी दोन्ही ठिकाणी मोठा फरक कायम आहे. २०२३ मध्ये ग्रामीण भागातील सरासरी वय २२.४ वर्षे तर शहरी भागात २४.३ वर्षे होते. २०२२ मध्ये हे वय अनुक्रमे २२.२ आणि २३.९ वर्षे होते.


२.१% मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी


या माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरावर, २.१% महिलांनी १८ वर्षांच्या आधी लग्न केले, २५% महिलांनी १८ ते २० वर्षांच्या दरम्यान लग्न केले आणि ७२.९% महिलांनी २१ किंवा त्याहून अधिक वयात लग्न केले. ग्रामीण भागात, संबंधित टक्केवारी अनुक्रमे २.५%, २८.१% आणि ६९.४% आहे, तर शहरी भागात ती अनुक्रमे १.२%, १७% आणि ८१.८% आहे. मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांच्या आधी लग्न करणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (६.३%) आणि सर्वात कमी केरळमध्ये (०.१%) आढळले.


अहवालात देशातील वैवाहिक स्थिती संदर्भातील आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.


अविवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित आहेत, ज्यात पुरुषांचे प्रमाण (५५.४%) महिलांपेक्षा (४५.३%) जास्त आहे. बिहारमध्ये अविवाहित लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक (५८.३%) आहे, तर तामिळनाडूमध्ये ती सर्वात कमी (४१.३%) आहे.


विवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ४५.९% लोक विवाहित आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (४९.०%) पुरुषांपेक्षा (४२.९%) जास्त आहे. विवाहित लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (५१.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (४०.२%) नोंदवली गेली.


विधवा/घटस्फोटित/वेगळे राहणारे : एकूण लोकसंख्येपैकी ३.६% लोक विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणारे आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (५.६%) पुरुषांपेक्षा (१.७%) जास्त आहे. विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणाऱ्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (६.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (१.५%) नोंदवली गेली

Comments
Add Comment

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi High Court : 'लंच ब्रेक'मध्ये झालेला अपघातही कामाचाच भाग, कर्मचारी भरपाईस पात्र

नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत

US Visa Bond Rule : ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय! आता US Visa साठी भरावा लागू शकतो १७ लाखांचा बॉण्ड

नवी दिल्ली : अमेरिकेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

Private Detectives : खासगी गुप्तहेरांवर येणार कायद्याचा वॉच! सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला मोठे निर्देश

नवी दिल्ली : देशभरात कार्यरत असलेल्या खासगी गुप्तहेर (Private Detectives) संस्थांवर कायदेशीर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त