देशात तब्बल इतक्या टक्के लोकांचे लग्नच झालेले नाही, आकडेवारी वाचून व्हाल हैराण

नवी दिल्ली : भारतात एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित असून बहुतांश राज्यांत मुलींचे लग्न १८ वर्षांनंतरच होत आहेत. तसेच देशभरातील मुलींच्या लग्नाचे सरासरी वय २२.९ वर्षे असल्याचे २०२३ सालच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस) या सांख्यिकी अहवालातून समोर आले आहे. २०२२ मध्ये हे वय २२.७ वर्षे होते.


१९९० पासून एसआरएस मार्फत दर सहा महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात मुलींच्या लग्नाचा डेटा गोळा केला जातो आणि त्यावरून सरासरी वय ठरवले जाते. पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांत अजूनही लक्षणीय संख्येने मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच विविध राज्यांत लग्नाचे सरासरी वय वेगवेगळे असून, पश्चिम बंगालमध्ये हे वय २१.३ वर्षे तर जम्मू-काश्मीरमध्ये २६.३ वर्षे आहे.


२०१९ ते २०२३ या पाच वर्षांची आकडेवारी पाहता, २०१९ मध्ये मुलींचे सरासरी लग्नाचे वय २२.१, २०२० मध्ये २२.७, २०२१ मध्ये २२.५ आणि २०२२ मध्ये २२.७ वर्षे होते. ग्रामीण आणि शहरी भागांतील मुलींच्या लग्नाच्या वयात सातत्याने वाढ होत असली तरी दोन्ही ठिकाणी मोठा फरक कायम आहे. २०२३ मध्ये ग्रामीण भागातील सरासरी वय २२.४ वर्षे तर शहरी भागात २४.३ वर्षे होते. २०२२ मध्ये हे वय अनुक्रमे २२.२ आणि २३.९ वर्षे होते.


२.१% मुलींचे लग्न १८ वर्षांपूर्वी


या माहितीच्या आधारे राष्ट्रीय स्तरावर, २.१% महिलांनी १८ वर्षांच्या आधी लग्न केले, २५% महिलांनी १८ ते २० वर्षांच्या दरम्यान लग्न केले आणि ७२.९% महिलांनी २१ किंवा त्याहून अधिक वयात लग्न केले. ग्रामीण भागात, संबंधित टक्केवारी अनुक्रमे २.५%, २८.१% आणि ६९.४% आहे, तर शहरी भागात ती अनुक्रमे १.२%, १७% आणि ८१.८% आहे. मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांच्या आधी लग्न करणाऱ्या महिलांचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (६.३%) आणि सर्वात कमी केरळमध्ये (०.१%) आढळले.


अहवालात देशातील वैवाहिक स्थिती संदर्भातील आकडेवारी देखील जाहीर करण्यात आली आहे.


अविवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ५०.५% लोक अविवाहित आहेत, ज्यात पुरुषांचे प्रमाण (५५.४%) महिलांपेक्षा (४५.३%) जास्त आहे. बिहारमध्ये अविवाहित लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक (५८.३%) आहे, तर तामिळनाडूमध्ये ती सर्वात कमी (४१.३%) आहे.


विवाहित : एकूण लोकसंख्येपैकी ४५.९% लोक विवाहित आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (४९.०%) पुरुषांपेक्षा (४२.९%) जास्त आहे. विवाहित लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (५१.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (४०.२%) नोंदवली गेली.


विधवा/घटस्फोटित/वेगळे राहणारे : एकूण लोकसंख्येपैकी ३.६% लोक विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणारे आहेत, ज्यात महिलांचे प्रमाण (५.६%) पुरुषांपेक्षा (१.७%) जास्त आहे. विधवा, घटस्फोटित किंवा वेगळे राहणाऱ्या लोकसंख्येची सर्वाधिक टक्केवारी तामिळनाडूमध्ये (६.८%) आणि सर्वात कमी टक्केवारी बिहारमध्ये (१.५%) नोंदवली गेली

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी

मराठा-कुणबी आरक्षण जीआरवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी