IND vs UAE: सूर्या ब्रिगेडची विजयी सलामी, भारताने यूएईला ९ विकेटनी हरवले

दुबई: आशिया कप २०२५मध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने यूएईवर दणदणीत विजय मिळवला आहे. यूएईवर भारताने ९ विकेट राखत विजय मिळवला आहे. या सामन्यात यूएईने पहिल्यांदा गोलंदाजी करताना अवघ्या ५७ धावाच केल्या. ५७ धावांतच त्यांचे १० गडी बाद झाले. कुलदीप यादवने चार बळी घेतले तर शिवम दुबेने तीन विकेट घेतल्या.


आजचा हा सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्यात टॉस जिंकत भारताने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यूएईच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १३.१ षटकांत केवळ ५७ धावा केल्या. यूएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर त्याच्यापाठोपाठ सलामीवीर मोहम्मद वसीमने १९ धावा केल्या.


त्यानंतर भारताचे सलामीवीर ही धावसंख्या पूर्ण करण्यास पुरेसे ठरले. सलामीवीर अभिषेक शर्माने ३० धावा ठोकल्या तर सलामीवीर शुभमन गिलने नाबाद २० धावांची खेळी केली. तिसऱ्या स्थानावर आलेल्या सूर्याने नाबाद ७ धावा केल्या.

भारताचा पुढील सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. १४ सप्टेंबरला हा सामना रंंगत आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)