देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण? आज होणार निवडणूक, काही तासांतच होणार निर्णय

नवी दिल्ली: भारताच्या १७व्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज संसद भवनात मतदान होणार आहे. या पदासाठी सामना एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात आहे. ही निवडणूक १६वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलैला आरोग्याच्या कारणामुळे अचानक राजीनामा दिल्याने होत आहे.

मतदान सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत खोली नंबर १०१, वसुधामध्ये होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता मतदान करतील. उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान होण्याआधी एनडीएचे खासदार सकाळी साडेनऊ वाजता ब्रेकफास्ट मीटिंगमध्ये सहभागी होतील. केंद्र सरकारचे वरिष्ठ मंत्री आपापल्या राज्यांच्या खासदारांचे यजमानपद रतील.

उपराष्ट्रपतीपदासाठी मतमोजणी संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा अथवा बुधवारी सकाळपर्यंत निकाल घोषित होतील.

नवी दिल्ली: भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज, ९ सप्टेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि 'इंडिया' आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीचे निकाल आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीतील आकडेवारी


उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात. या निवडणुकीत एकूण ७८१ मतदार आहेत.

निवडणुकीतील प्रमुख उमेदवार


एनडीएचे उमेदवार: सी. पी. राधाकृष्णन

'इंडिया' आघाडीचे उमेदवार: माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी
Comments
Add Comment

#FacebookDown : जगभरात मेटासह फेसबुकची सेवा ठप्प! लॉगिन, न्यूज फीड, वेबसाइट बंद; लाखो वापरकर्ते त्रस्त

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकची ( #FacebookDown ) सेवा आज

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक