Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय; मीरा-भाईंदर ते अकोला, रायगड ते संभाजीनगर, तर शेतकऱ्यांना...!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शेतकरी, नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असे चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी सर्वात मोठा निर्णय म्हणजे उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दरातील सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देणे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी तब्बल ११६ कोटी रुपये कर्ज उभारणीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या भागातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे. या व्यतिरिक्त इतर दोन निर्णयही कृषी आणि नागरी विकासाशी निगडित असून, राज्य सरकारच्या या पावलामुळे जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



मंत्रिमंडळ बैठकीतील ठळक निर्णय




१. ऊर्जा विभाग – शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा


उपसा जलसिंचन योजनांना दिलेल्या वीजदर सवलतीची मुदत मार्च २०२७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय. अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब अशा तब्बल १,७८९ योजनांना थेट फायदा, शेतकरी सभासदांना मोठा दिलासा.



२. नगरविकास विभाग – पायाभूत सुविधांना गती


नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २,००० कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी.




  • छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी

  • नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पांसाठी २६८ कोटी

  • मीरा-भाईंदर पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी निधी.


३. मृद व जलसंधारण विभाग- शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा


अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प दुरुस्तीला हिरवा कंदील. या कामामुळे सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होणार.



४. महसूल विभाग- इंटेलिजन्स ब्युरोसाठी जमीन मंजूर


रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन इंटेलिजन्स ब्युरोच्या सब्सिडरीला देण्याचा निर्णय. या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राहिवासी क्वार्टर्स उभारले जाणार.

Comments
Add Comment

Chiplun Crime : सकाळी लवकर उठ म्हणताच सुनेचा संताप! सासूला बेदम मारहाण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शेतात

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Delhi Riots : आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक ताहिर हुसेन दोषी

नवी दिल्ली: २०२० च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान गुप्तचर विभागातील (IB) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात

IND(w) vs ENG(w) : ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानात भारताच्या 'रन'रागिणींचा महा-पराक्रम; इंग्लंडवर २७० धावांनी दणदणीत विजय

लंडन: क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने नवा इतिहास

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे