Punjab News : रावी, सतलज आणि चिनाब नद्यांचं रौद्ररूप! ४ कोटी लोकांवर जीवघेणं संकट, ५६ जणांचा बळी...

अमृतसर : पाकिस्तानमधील रावी, सतलज आणि चिनाब या नद्यांना आलेल्या पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पुराचा २५ जिल्ह्यातील तब्बल ४,१०० हून अधिक गावांना फटका बसला आहे. २६ ऑगस्टपासून आतापर्यंत पंजाब प्रांतात सुमारे ५६ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. अनेक नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) मदत छावण्यांची उभारणी केली असून वैद्यकीय सेवांसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती महासंचालक इरफान अली काठिया यांनी दिली.



५६ जणांचा मृत्यू


पाकिस्तानात नद्यांना आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत २५ जिल्ह्यांतील ४,१०० पेक्षा जास्त गावे जलमय झाली असून पंजाब प्रांतात किमान ५६ जणांचा बळी गेला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आपत्तीमध्ये शेकडो नागरिक बेघर झाले असून काहीजण अजूनही बेपत्ता आहेत. पुरात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, या पुरामुळे तब्बल ४.१ कोटी लोकांवर परिणाम झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या विस्थापनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने ४२५ मदत छावण्या व तंबू नगरी उभारली असून, येथे नागरिकांना अन्न व तात्पुरते निवास दिले जात आहे.



पाकिस्तानात वैद्यकीय छावण्यांची धावपळ; १,७५,००० रुग्णांवर उपचार


पाकिस्तानातील पूरग्रस्त भागांमध्ये वैद्यकीय मदतीची मोठी चळवळ उभारण्यात आली आहे. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ५०० हून अधिक वैद्यकीय छावण्या सध्या कार्यरत असून येथे जखमी, संसर्गजन्य आणि जलजन्य आजारांनी त्रस्त असलेल्या तब्बल १.७५ लाख रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. बचाव कार्यामध्ये आतापर्यंत २ कोटीहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (PDMA) महासंचालक इरफान अली काठिया यांनी सांगितले की, पंजाबच्या कृषी क्षेत्रातील उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी १.५कोटीहून अधिक जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी हलवली गेली आहेत.



पाकिस्तानात ९०० मृत्यू; १,००० हून अधिक जखमी


पंजाबमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (PDMA) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील ४२ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. रावी, सतलज आणि चिनाब नद्यांच्या काठावरील ४१००हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. मुल्तानचे उपायुक्त वसीम हामिद सिंधू यांनी सांगितले की, हेड त्रिमू भागातून येणाऱ्या संभाव्य पूराच्या धोक्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विस्तृत कार्ययोजना तयार केली आहे. दरम्यान, चिनाब नदीवरील हेड मुहम्मदवाला आणि शेरशाह बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने दबाव थोडासा हलका झाला आहे. तथापि, नव्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीची पातळी पुन्हा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारलेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) आकडेवारीनुसार, २६ जूनपासून सुरु झालेल्या मान्सून पावसात आणि पुरात पाकिस्तानभरात ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १,००० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती