कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या फ्राइड राईसमध्ये झुरळ आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. मुळात हे हॉटेल कल्याण शहरातील जूने आणि प्रचलित हॉटेल असल्याकारणांमुळे ही बातमी अनेकांसाठी धक्का देणारी ठरत आहे. 


याच हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना घडली होती, हे प्रकरण ताजे असतानाच, आता पुन्हा एकदा रामदेव हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे ग्राहकांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे.



पार्सल फ्राईड राईसमध्ये झुरळ


निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये पार्सल घ्यायला गेल्या होत्या. त्यांनी फ्राईड राईस मागवला असता त्यामध्ये झुरळ आढळले. धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे. मुलांना फ्रुड पॉइझन झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. सलग घडणाऱ्या घटनांमुळे रामदेव हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह