बेल्जियममधून मेहुल चोक्सीला भारतात आणणार ?


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करुन फरार झाल्याचा आरोप असलेल्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला लवकरच बेल्जियममधून भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. मेहुलला ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारच्यावतीने बेल्जियमला ठोस आश्वासन देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मेहुल चोक्सीने जामीन मिळावा म्हणून केलेला अर्ज बेल्जियमच्या अपील न्यायालयाने फेटाळला आहे.


अटक टाळण्यासाठी भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत आता बेल्जियममध्ये जाऊन पोहोचला आहे. सीबीआयने पाठवलेल्या हस्तांतरणाच्या विनंतीनंतर मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. बेल्जियमच्या न्यायालयाने मेहुल चोक्सीचा अटकपूर्व जामीन नाकारला. अटकेनंतर मेहुल चोक्सीने २२ ऑगस्ट रोजी आणखी एक जामीन अर्ज दाखल केला. त्याने नजरकैदेत राहण्याची तयारी दाखवली. पण अपील न्यायालयाने नजरकैद करण्यासाठीचा अर्ज आणि जामीन अर्ज हे दोन्ही फेटाळले. यामुळे मेहुल चोक्सी तुरुंगात आहे.


गीतांजली समुहाचा मालक असलेल्या ६६ वर्षांच्या मेहुल चोक्सीच्या भारताकडे हस्तांतरण करण्याच्या याचिकेवर सप्टेंबरच्या मध्यात बेल्जियमच्या न्यायालयात सुनावणी होईल. मेहुल चोक्सीचे भारताकडे हस्तांतरण व्हावे यासाठी सीबीआय आणि बेल्जियम समन्वय राखून एक मजबूत केस तयार करत आहेत. भारताला पंजाब नॅशनल बँकेतील १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी या दोघांना अटक करुन त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायची आहे. आरोपींनी पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रॅडी हाऊस शाखेतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट प्रतिज्ञापत्रांद्वारे १३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.


Comments
Add Comment

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

भारतीय बाजारात अ‍ॅपल मोठ्या संकटात? गुप्त अहवालात मोठी माहिती उघड

प्रतिनिधी: भारतीय बाजारात अ‍ॅपल कंपनी नव्या संकटात सापडली आहे. भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commision of India) या नियामक

बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, महापालिकेवर पुन्हा सत्ता

विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

जळगावकर म्हणतायत.. तुमची आमची भाजपा सर्वांची! भाजपचा हा नेता ठरला धुरंधर

जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात शतप्रतिशत विजय मिळवला आहे.