केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट : महागाई भत्ता ऑक्टोबरमध्ये ३% ने वाढणार

नवी दिल्ली (प्रतिनिधी):


सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेट देणार आहे. केंद्र सरकार महागाई भत्ता (डीए) आणि महागाई सवलत (डीआर) मध्ये ३% वाढ जाहीर करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. देशभरातील १.२ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होईल. त्याची औपचारिक घोषणा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाऊ शकते. यावेळी सरकार दिवाळीच्या वेळी ही घोषणा करेल. जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त दिलासा मिळू शकेल. दुरुस्तीनंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५% वरून ५८% पर्यंत वाढेल. ही वाढ जुलै २०२५ पासून लागू मानली जाईल, म्हणजेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळेल, जी ऑक्टोबरच्या पगारासह दिली जाणार आहे. केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते. पहिली सुधारणा होळीपूर्वी दुसरी सुधारणा दिवाळीपूर्वी. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये सरकारने दिवाळीच्या सुमारे २ आठवडे आधी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा केली होती.

Comments
Add Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

राजघाटावर पोहोचले पंतप्रधान मोदी, राष्ट्रपिता महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली: आज २ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी यांची जयंती देशभर मोठ्या आदराने साजरी होत आहे. याच निमित्ताने

राज्यभरात आज दसरा मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे, नेस्कोमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे, तर बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा

मुंबई : राज्यभरात आज विविध राजकीय नेत्यांचे दसरा मेळावे होत आहेत.  यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि

८ ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

मुंबई (प्रतिनिधी) : २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.