कॉर्पोरेट कंपन्यांचा बँकेतून कर्ज घेण्याकडे नकारात्मक कौल

प्रतिनिधी:आरबीआयच्या नव्या आकडेवारीनुसार, कॉर्पोरेट कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेण्यात घसरण झाली आहे. बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी या बँकांनी अपारंपारिक स्त्रोतांकडे लक्ष केंद्रित केल्याने बँकेकडून निधी उभारणीकडे कंपन्यांचा कल नसल्याचे निरि क्षण आरबीआयने नोंदवले आहे. याऐवजी कंपन्या कॉर्पोरेट बाँड, भांडवली बाजार (Capital Market), व इतर स्त्रोतांचा वापर करत आहेत. त्यामुळे आकडेवारीत पाहिल्यास यावर्षी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) मागील वर्षाच्या तिमाहीतील तुलनेत या तिमा हीत १७% घसरण झाली आहे. ज्यामुळे या निधी उभारणीचे मूल्यांकन १७ ट्रिलियन रूपयांवर पोहोचल्याचे आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.


याखेरीज विना वित्त कंपन्यांनी (Non Financial Companies) मात्र इयर बेसिसवर निधी उभारणीत वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी तिमाहीत ही संख्या १.४ ट्रिलियन होती ती वाढत या तिमाहीत ३.८ लाख ट्रिलियन झाली आहे. तर विना वित्त कंपन्यांनी कॉर्पोरेट बाँड जारी करत आपल्या नव्या निधीत वाढ नोंदवली आहे. इयर ऑन इयर बेसिसवर ही वाढ १८% झाली असून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ही संख्या १.९ ट्रिलियनवर गेली असल्याचे आरबीआयने सांगितले. तसेच महत्वाच्या निरिक्षणानुसार, विना बँकिंग स्त्रोतातून निधी उभारणीत मोठी वाढ झाली आहे.


या प्रकारच्या अथवा विदेशी फंडिगमधून कंपन्यांनी ३३.५% वाढ नोंदवली असून घरगुती निधी स्त्रोतातून ३५% वाढ नोंदवली आहे. मात्र आरबीआयच्या आकडेवारीनुसार यावर्षी झालेली निधी उभारणी केवळ ३% ने वाढली आहे जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मंद वेगाने झालेली निधी उभारणीत वाढ आहे.

Comments
Add Comment

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

समृद्ध पंचायतराज अभियानातून राज्यात सर्वाधिक बक्षिसे मतदार संघाने मिळवावीत: ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

समृद्ध पंचायतराज अभियानासाठी विशेष प्रयत्न करा दापोली: ग्रामविकास व पंचायतीराज विभागामार्फत राबविण्यात

सीमेवर लावणार अत्याधुनिक रडार प्रणाली

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांनंतर, भारतीय लष्कराने उत्तरी आणि पश्चिम सीमेवर

केसात गजरा माळला म्हणून अभिनेत्री नव्या नायरला १.१४ लाखांचा दंड!

मुंबई: लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री नव्या नायर हिला ऑस्ट्रेलियात एका साध्या चुकीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती