लालबागच्या राजामुळे मुंबईत विसर्जन मिरवणूक रखडली, तर पुण्यात तब्बल ३२ तासांनी मिरवणूक संपली!

पुणे: काल शनिवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरातील सर्व दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील काही प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्त्यांची भव्यदिव्य मिरवणूक काढली जात असल्याकारणामुळे, त्यांचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी गिरगाव चौपाटीवर केले जाते. मुंबईतील या सर्व गणेशमूर्त्या अंदाजे सकाळी ९ वाजेपर्यंत विसर्जित केले जातात. मात्र यंदा लालबागचा राजाचे विसर्जन नियोजित वेळेमध्ये होऊ शकले नाही. आज संध्याकाळचे ७ वाजून गेले तरी लालबागचा राजा तराफ्यावरच चढवण्यात आला होता. समुद्राला आलेल्या तूफान भरतीमुळे लालबागचा राजाला विसर्जनासाठी आणखीन काही तास थांबावे लागणार असल्याचे, मंडळ सचिव सुधीर साळवी यांनी माहिती दिली. त्यामुळे या वर्षी मुंबईतली विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला २४ तास उलटून गेले तरी अद्याप संपली नसल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक संपली असल्याचे पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पुण्यातील विसर्जन मिरवणूक २९ तास चालली होती, मात्र यावर्षी या मिरवणूका थोड्या उशिरा संपल्या आहेत. याबद्दल माहिती देताना, गणपती विसर्जनाचे सर्व कार्यक्रम पुण्यात शांततेत पार पडल्याची प्रतिक्रिया पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांना दिली आहे.


गणपती विसर्जनाच्या पर्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुण्यातील सर्व गणेश मंडळानी सहकार्य केले. मोठा बंदोबस्त १२ दिवसांपासून लावण्यात आला होता. सगळा सोहळा शांततेत पार पडला. सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन. गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे यश आल्याचे मत यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.


गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुण्यातली मिरवणूक उशिरा संपल्याबद्दल त्यांना प्रश्न केला असता, ते म्हणाले "किती वाजता मिरवणूक संपेल हे महत्वाचं नाही. तर मधल्या वेळेत काही मंडळांचा मंडळांशी आक्षेप होता ते सोडवण्यात आले. प्रत्येक मंडळांना योग्य वेळ मिरवणुकीसाठी मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती. मिरवणूक उत्साहात पार पडली पाहिजे हे आमचे उद्दिष्ट होते, मत कुमार यांनी व्यक्त केले.



विसर्जनानंतर पुणे मेट्रोत तूफान गर्दी


गणेश विसर्जनाची रात्र पुण्यात जल्लोषात पार पडली. मिरवणूक पाहून झाल्यानंतर पुणेकरांनी घर गाठण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं. गर्दी टाळण्यासाठी अनेकांनी खासगी वाहनं किंवा बसऐवजी मेट्रोचा सोपा पर्याय निवडला. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोत दाखल झाल्याने तुफान गर्दीची परिस्थिती निर्माण झाली.



पुण्यातील शेवटच्या गणपतीला निरोप, लालबागचा राजा अजून बाकी


पुण्यातील शेवटचा महाराष्ट्र्र तरुण मंडळाचा गणपती ४.३० वाजता टिळक चौकातून विसर्जन घाटावर मार्गस्थ झाला. त्याला भावपूर्ण निरोप देत विसर्जन मिरवणुकीला पूर्णविराम देण्यात आला आहे. यावर्षी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक विक्रमी ३२ तास चालली आहे. मात्र मुंबईत वातावरण वेगळेच आहे. लालबागचा राजाचे विसर्जन रखडल्यामुळे गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी जमली आहे. मुंबईच्या भरतीमुळे राजाला समुद्रात घेऊन जाता येत नसल्याचे सूत्रांनी माहिती दिली असून, समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.



लालबागच्या राजाचं विसर्जन किती?


लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी विसर्जनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोळी बांधवांशी झालेल्या चर्चेनुसार रात्री साडेदहा नंतर विसर्जन होईल, असं ते म्हणाले.

Comments
Add Comment

'महायुती' सरकारचा मोठा राजकीय 'गेम'; ५४ आमदारांच्या मतदारसंघांसाठी राज्य सरकारचे २७० कोटी

मुंबई: राज्यातील सत्ताधारी 'महायुती' सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या