नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात जड वाहनांच्या (ट्रक, डंपर, कंटेनर, ट्रेलर इत्यादी) वाहतुकीवर काही वेळेसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.


या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ८ सप्टेंबरपासून पुढील एक महिना दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत शहरात कोणत्याही जड वाहनांना प्रवेश निषिद्ध असेल. नागपूर शहरातून फक्त रात्री १० नंतर ते सकाळी ६ पर्यंतच अशा प्रकारची वाहने शहरात येऊ शकतील.


शहरातून फक्त जात असलेल्या किंवा शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या ट्रक वगैरे वाहनांनी फक्त बाह्य रिंगरोडचा वापर करावा, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. जर कुणी या नियमांचं उल्लंघन केलं, तर संबंधित वाहनचालकावर १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.


नवीन वाहतूक अधिसूचनेनुसार, सर्व जड वाहने आता नागपूर शहराच्या बाहेरूनच वळवण्यात येणार आहेत, आणि त्यासाठी बाह्य रिंगरोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.


या निर्णयाअंतर्गत, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, रायपूर, जबलपूर आणि मध्य प्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी निश्चित मार्ग आखण्यात आले आहेत, जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल.


तथापि, काही अत्यावश्यक वाहतुकीसाठी विशेष परवानग्या दिल्या जातील. यामध्ये:


भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) अजनी येथील गोदामात जाणारे ट्रक


रेल्वे मालधक्का (Goods Shed) पर्यंत पोहोचणारी वाहने


संत्रा मार्केटमध्ये पुरवठा करणारे ट्रक


हे ट्रक विशेष परवानगी घेऊन ठराविक वेळेतच शहरात प्रवेश करू शकतात. यामुळे नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरळीत होईल. हा निर्णय नागपूरच्या रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेला विशेष पथके तयार करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे