मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाटा पॉवरच्या हाय-टेन्शन इलेक्ट्रिक वायरचा शोक लागल्याने  ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.



अपघात कसा झाला?


प्राथमिक माहितीनुसार, विसर्जनासाठी जाणारा गणपती मंडप विजेच्या तारेच्या अगदी जवळ आल्याने हा अपघात झाला. या दरम्यान, विजेचा जोरदार धक्का लागून ६ जण भाजले. अपघातानंतर लगेचच सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी ५ जणांना साकीनाका येथील पॅरामाउंट हॉस्पिटलमध्ये आणि एकाला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.


या अपघातात विनू शिवकुमार नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याचवेळी, उर्वरित ५ जखमींपैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांच्यावर पॅरामाउंट हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.



या अपघातात जखमी झालेल्यांची नावे 


तुषार गुप्ता (१८)


धर्मराज गुप्ता (४४)


आरुष गुप्ता (१२)


शंभू कामी (२०)


करण कनोजिया (१४)




१८,००० हून अधिक मूर्तींचे विसर्जन


मुंबईत काल जल्लोषात १० दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शनिवारी अनंत चतुर्दशीला, ऐन पावसात, ढोल-ताशे आणि गुलाल उडवतलोकांनी आपापल्या बाप्पाला निरोप दिला. एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री ९.० वाजेपर्यंत मुंबईतील विविध जलाशयांमध्ये १८,००० हून अधिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर जलस्रोतांवर गणेशमूर्त्या विसर्जनासाठी नेले जात असताना, त्यांची झलक पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर, झाडांवर आणि खांबांवर बसलेले दिसले.

Comments
Add Comment

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक