विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून, चंद्रग्रहण सुरू होण्याआधी लालबागचा राजा समुद्रात लीन झाला. हा भावनिक क्षण लाखों भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. अशाप्रकारे, तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र काही निवडक गणपतींचे विसर्जन आज सकाळच्या प्रहरी गिरगांव चौपाटीवर करण्यात आले. मात्र लालबागचा राजाचे विसर्जन काही कारणांमुळे रखडले गेले होते. त्यांनंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला आणखीनच उशीर झाला होता, त्यामुळे समुद्राचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. दरम्यान लालबागचा राजाचे विसर्जन का रखडले? याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. तेव्हा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी समुद्राला आलेल्या भरतीचे कारण देत, रात्री १०.३० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र चंद्रग्रहणाचे सावट पाहता, त्याआधीच राजाचे विसर्जन करण्यात आले.


 



 

आज रात्री ९.५८ पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असल्याकारणांमुळे, लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणाच्या आधी होणे अपेक्षित होते, आणि याच कारणामुळे सायंकाळी ८.०० वाजता बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली.  शेवटची आरती करत राजाचा तराफा समुद्रात हलवला गेला. तराफा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याकारणामुळे अधिक वेळ न घेता,  सोईस्कररित्या राजाची मूर्ती समुद्रात आणली गेली, आणि अंदाजे रात्री ९.१० च्या जवळपास लालबागच्या राजाला समुद्रात लीन करण्यात आले.



चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद


आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. हे  चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११.४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्याने पाहता येऊ शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही वेळ  काळोख पसरण्यााची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

राज्यातील कोणत्या महापालिकेत कोण झाले महापौर ? वाचा सविस्तर यादी

मुंबई : राज्यात विविध महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. राज्यातील जवळपास आठ ते

Vijay Wadettiwar: गल्लीतला वाद दिल्लीत नेणाऱ्या काँग्रेसच्या वडेट्टीवारांना पक्ष नेतृत्वापाठोपाठ विभागीय आयुक्तांनी दिला दणका

नागपूर: काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादात दिल्लीमध्ये तोडगा निघाल्याचा चित्र दिसत आहे. मंगळवारी रात्री झालेल्या

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींची धक्कादायक कृती

गाझियाबाद : ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहि‍णींनी

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने