विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून, चंद्रग्रहण सुरू होण्याआधी लालबागचा राजा समुद्रात लीन झाला. हा भावनिक क्षण लाखों भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. अशाप्रकारे, तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र काही निवडक गणपतींचे विसर्जन आज सकाळच्या प्रहरी गिरगांव चौपाटीवर करण्यात आले. मात्र लालबागचा राजाचे विसर्जन काही कारणांमुळे रखडले गेले होते. त्यांनंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला आणखीनच उशीर झाला होता, त्यामुळे समुद्राचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. दरम्यान लालबागचा राजाचे विसर्जन का रखडले? याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. तेव्हा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी समुद्राला आलेल्या भरतीचे कारण देत, रात्री १०.३० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र चंद्रग्रहणाचे सावट पाहता, त्याआधीच राजाचे विसर्जन करण्यात आले.


 



 

आज रात्री ९.५८ पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असल्याकारणांमुळे, लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणाच्या आधी होणे अपेक्षित होते, आणि याच कारणामुळे सायंकाळी ८.०० वाजता बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली.  शेवटची आरती करत राजाचा तराफा समुद्रात हलवला गेला. तराफा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याकारणामुळे अधिक वेळ न घेता,  सोईस्कररित्या राजाची मूर्ती समुद्रात आणली गेली, आणि अंदाजे रात्री ९.१० च्या जवळपास लालबागच्या राजाला समुद्रात लीन करण्यात आले.



चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद


आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. हे  चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११.४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्याने पाहता येऊ शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही वेळ  काळोख पसरण्यााची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका

President Draupadi Murmu: राष्ट्रपती २५ फेब्रुवारी रोजी करणार राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

अकोला :  भारत सरकारचे आयुष मंत्रालय, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २८

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील