विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून, चंद्रग्रहण सुरू होण्याआधी लालबागचा राजा समुद्रात लीन झाला. हा भावनिक क्षण लाखों भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. अशाप्रकारे, तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र काही निवडक गणपतींचे विसर्जन आज सकाळच्या प्रहरी गिरगांव चौपाटीवर करण्यात आले. मात्र लालबागचा राजाचे विसर्जन काही कारणांमुळे रखडले गेले होते. त्यांनंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला आणखीनच उशीर झाला होता, त्यामुळे समुद्राचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. दरम्यान लालबागचा राजाचे विसर्जन का रखडले? याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. तेव्हा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी समुद्राला आलेल्या भरतीचे कारण देत, रात्री १०.३० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र चंद्रग्रहणाचे सावट पाहता, त्याआधीच राजाचे विसर्जन करण्यात आले.


 



 

आज रात्री ९.५८ पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असल्याकारणांमुळे, लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणाच्या आधी होणे अपेक्षित होते, आणि याच कारणामुळे सायंकाळी ८.०० वाजता बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली.  शेवटची आरती करत राजाचा तराफा समुद्रात हलवला गेला. तराफा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याकारणामुळे अधिक वेळ न घेता,  सोईस्कररित्या राजाची मूर्ती समुद्रात आणली गेली, आणि अंदाजे रात्री ९.१० च्या जवळपास लालबागच्या राजाला समुद्रात लीन करण्यात आले.



चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद


आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. हे  चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११.४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्याने पाहता येऊ शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही वेळ  काळोख पसरण्यााची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

'महायुती' सरकारचा मोठा राजकीय 'गेम'; ५४ आमदारांच्या मतदारसंघांसाठी राज्य सरकारचे २७० कोटी

मुंबई: राज्यातील सत्ताधारी 'महायुती' सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय

तुमच्या खिशातली ५००ची नोट खरी आहे की नकली? हा धक्कादायक प्रकार ऐकून पायाखालची जमीनच सरकेल!

अमरावती: सावधान! तुमच्या हातात येणारी प्रत्येक ५०० रुपयांची नोट खरी आहे की, बनावट? कारण, अमरावती जिल्ह्यात बनावट

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि

अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये! कराची : भारतात झालेल्या