विसर्जनाचे ग्रहण सुटले! चंद्रग्रहणाच्या आधी लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

मुंबई: सहा ते सात तासांच्या प्रतिक्षेनंतर अखेर लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे ग्रहण अखेर सुटले असून, चंद्रग्रहण सुरू होण्याआधी लालबागचा राजा समुद्रात लीन झाला. हा भावनिक क्षण लाखों भाविकांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतला. अशाप्रकारे, तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले आहे.


मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी पार पडले. मात्र काही निवडक गणपतींचे विसर्जन आज सकाळच्या प्रहरी गिरगांव चौपाटीवर करण्यात आले. मात्र लालबागचा राजाचे विसर्जन काही कारणांमुळे रखडले गेले होते. त्यांनंतर समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला आणखीनच उशीर झाला होता, त्यामुळे समुद्राचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. दरम्यान लालबागचा राजाचे विसर्जन का रखडले? याबाबत अनेक चर्चा होऊ लागल्या होत्या. तेव्हा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी समुद्राला आलेल्या भरतीचे कारण देत, रात्री १०.३० वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन केले जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. मात्र चंद्रग्रहणाचे सावट पाहता, त्याआधीच राजाचे विसर्जन करण्यात आले.


 



 

आज रात्री ९.५८ पासून चंद्रग्रहणाला सुरुवात होणार असल्याकारणांमुळे, लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणाच्या आधी होणे अपेक्षित होते, आणि याच कारणामुळे सायंकाळी ८.०० वाजता बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू झाली.  शेवटची आरती करत राजाचा तराफा समुद्रात हलवला गेला. तराफा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्याकारणामुळे अधिक वेळ न घेता,  सोईस्कररित्या राजाची मूर्ती समुद्रात आणली गेली, आणि अंदाजे रात्री ९.१० च्या जवळपास लालबागच्या राजाला समुद्रात लीन करण्यात आले.



चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद


आज चंद्रग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात देखील दिसणार आहे. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. हे  चंद्रग्रहण रात्री ९.५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११  वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११.४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी उघड्या डोळ्याने पाहता येऊ शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी रात्री काही वेळ  काळोख पसरण्यााची दाट शक्यता आहे.

Comments
Add Comment

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

Iran-US-Israel War : चीनकडून सर्व देशांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या आणि हॉर्मुज सामुद्रधुनीवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनने सर्व

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

मुंबईत गॅस तुटवडा नाही, महापौरांनी केले 'हे' मुंबईकरांना आवाहन

मुंबई: मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र निर्माण केले जात असून ही अफवा केवळ काँग्रेस आणि