कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण अजित गावडे (वय १०) चे  हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. गणेश मंडपात मित्रांसोबत खेळत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली, म्हणून तो घरी पळत गेला, आणि त्याने आईच्या मांडीवर डोके टेकले. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कोडोली आणि परिसरात शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण त्याच्या कुटुंबासह वैभव नगरमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी तो गणपती मंडळात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळताना अचानक त्याची तब्येत बिघडली म्हणून तो घरी पळत गेला. त्याच्या आईच्या कुशीत त्याने आपले डोक टेकले, पण काही कळेल तितक्यात त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, श्रावणचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

श्रावणच्या अशा अचानक मृत्यूमुळे गावडे कुटुंबात शोककळा पसरली आहे. अजित गावडे यांना दोन मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांची मुलगी चार वर्षांपूर्वीच वारली होती. आता त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने कुटुंबात आणि गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण शेजारच्या लोकांचा लाडका होता, त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचे सर्व कौतुक करत असत. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठी धक्कादायक असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे