हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस सहा, सात आणि आठ सप्टेंबर रोजी राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
दरम्यान आज सकाळपासून राज्यात ढगाळ वातावरण असून, मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपात पावसानं हजेरी लावली आहे. पुढील २४ तासांमध्ये मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे धुळे नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.