Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व गणेशभक्त मग्न असणार आहे. यादरम्यान मुंबई, पुणे येथे गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक काढली जाते. त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर बाप्पाच्या दर्शनाला येणार आहे. पण यादरम्यानच हवामान खात्याकडून एक मोठी बातमी मुंबई, पुणे तसेच संपूर्ण राज्यासाठी आहे. ती म्हणजे आज पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस सहा, सात आणि आठ सप्टेंबर रोजी राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे.

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज


दरम्यान आज सकाळपासून  राज्यात ढगाळ वातावरण असून, मुंबईत  मध्यम ते मुसळधार स्वरुपात पावसानं हजेरी लावली आहे.  पुढील २४ तासांमध्ये मुंबई, पालघर, ठाणे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे धुळे नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Comments
Add Comment

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात

राज्यात अतिवृष्टीमुळे १४.४४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी