Urban Company व boAt कंपन्यांच्या आयपीओला सेबीकडून मंजूरी

मोहित सोमण: प्रसिद्ध कंपन्या अर्बन कंपनी (Urban Company), बोट (Boat) यांच्या आयपीओला बाजार नियामक सेबीने अखेरीस मान्यता दिली आहे. सेबीने दोन्ही कंपन्याना आयपीओसाठी परवानगी दिल्याने दोन्ही कंपन्यांचा शेअर बाजारातील मार्ग खुला झाला आहे. अर्बन कंपनीने आयपीओसाठी एप्रिल महिन्यात डीएचआरपी अर्ज (Draft Red Herring Prospectus DHRP) केला होता. अर्बन कंपनीचा ४२९ कोटीचा हा आयपीओ असणार असून ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत १४७१ कोटी मूल्याचे आयपी ओसाठी बाजारात उपलब्ध असतील. दुसरीकडे प्रसिद्ध बोट ब्रँड असलेली इम्याजिन मार्केटिंग (Imagine Marketing Limited) कंपनीने गोपनीय पद्धतीने डीएआरपी भरला असल्याची माहिती पुढे आली आहे. काही अहवालातील माहितीनुसार, बोट कंपनी चा आयपीओ १३००० कोटींचा असू शकतो.


अर्बन कंपनीने आतापर्यंत ४५० दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक जागतिक पटलावरून मिळवली आहे. अर्बन कंपनीने भारतातील प्रमुख शहरात आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. कंपनीने रेग्युलेटरी फायलिंगमधील दिलेल्या माहितीनुसार, अर्बन कंपनीने आर्थिक वर्ष २५ मध्ये वार्षिक तुलनेत ३८% वाढ नोंदवली आहे आणि नफा मिळवत ११४४ कोटींवर पोहोचली आहे, तर निव्वळ उत्पन्नात २८.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आयपीओमधून मिळणारे उत्पन्न सेवा गुणवत्ता वाढविण्यासाठी, विद्यमान क्षेत्रांमध्ये पुर वठा वाढवण्यासाठी आणि नवीन श्रेणींमध्ये विस्तार करण्यासाठी वापरण्याची अपेक्षा आहे.' असे म्हटले आहे.


बोट कंपनी ही ऑडिओ वेअरेबल्स, स्मार्टवॉच आणि वैयक्तिक अक्सेसरीज इत्यादी उत्पादन पोर्टफोलिओ असलेली कंपनी आहे. बोट (boAt) भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडपैकी एक म्हणून सध्या उदयास आली आहे प्रसारमाध्यमांनी दिले ल्या माहितीनुसार, बोटने आतापर्यंत १७० दशलक्ष डॉलर्स उभारले आहे. २०१६ साली या कंपनीची स्थापना झाली होती. बोट व अर्बन कंपनीसह WeWork India, PhysicWallah, Groww कंपन्यांनीही सेबीकडे डीएचआरएपी भरून आयपीओसाठी अर्ज केले आ हेत.

Comments
Add Comment

Hasan Mushrif : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लागणार

लोकहितासाठी शासन पर्यायी जागेचा विचार करणार - मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : अमरावती शहरापासून १२ ते १५ किलोमीटर दूर

Aditi Tatkare : गुलाबी ई-रिक्षा योजनेसाठी आरटीओ प्रक्रिया अधिक सोपी करणार; प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन प्रयत्नशील

चालू आर्थिक वर्षात ५,००० महिलांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट - मंत्री अदिती तटकरे मुंबई : राज्यातील महिलांना

Vidhansabha Monsoon Session : मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये वादंग

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी मंत्र्यांच्या अनुपस्थिवरून विधानसभा आणि विधान परिषद

Atul Bhatkhalkar : "कोरोनात घरात बसणाऱ्यांनी राम मंदिरावर बोलू नये"; आमदार अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : जे ढग गरजत असतात ते बरसत नाही. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे.