विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्यांचे व्हिडिओ तसेच फोटो काढण्यावर बंदी, पुणे पोलिसांचे कडक निर्देश

पुणे: पुणे पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी ४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित करणे तसेच ते सोशल मिडियावर सार्वजनिक करणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जेणेकरून गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि सार्वजनिक शांतता राखली जाईल हा त्यामागचा हेतू आहे.

भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. उद्या अनंत चतुर्दशी असून, शनिवारी पुण्यातील अनेक गणेश मूर्तींचे विसर्जन वेगवेगळ्या तलावात केले जाईल. त्यानंतर विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्यांचे अवशेष सोशल मिडियावर पोस्ट केले जातात, ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.

त्यामुळे पुणे पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली कडक कारवाई केली जाईल.
Comments
Add Comment

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

वाढवण बंदरामध्ये हजारो स्थानिक तरुणांना मिळणार रोजगार, तरुणांसाठी 'जीपी रेटिंग प्री-सी ट्रेनिंग कोर्स' सुरू

पालघर : भारतातील १३ वे प्रमुख बंदर असलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड मध्ये स्थानिक तरुणांना नोकरीची संधी

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन