अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने अंत्ययात्रेची तयारी केली. परंतु हा तरुण जीवंत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. याबाबत रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडून खुलासा करताना सांगण्यात आले आहे की नातेवाईकांनी तरुण रुग्ण हा घरी नेत असल्याचे सांगितले तर जिल्हा रुग्णालयात या तरुणावर आता नव्याने उपचार केले जात आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी त्रंबकेश्वर तालुक्यातील युवक दुचाकीहून घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला त्रंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी अधिक उपचारासाठी या तरुणाला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे करण्यात आले. परंतु, शासकीय रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसल्याकारणाने या आदिवासी परिवाराने या रुग्णाला आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ.वसंत पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये दाखल केले. याठिकाणी तीन दिवस त्याच्यावरती उपचार करण्यात आले. डॉ.वसंत पवार रुग्णालयाच्यावतीने मेंदू मृत झाला आहे,असे सांगण्यात आले. त्याला घरी घेऊन जा किंवा या ठिकाणी उपचार करू द्या असे सांगितले.


परंतु नातेवाईकांनी याचा वेगळा अर्थ काढला आणि तरुण मृत्यू झाला म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयात आणले गेले. तर दुसरीकडे मात्र नातेवाईकांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली ही सर्व घडामोड घडत असताना या ठिकाणी तरुणाला खोकला आला आणि तरुण जिवंत असल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबत खुलासा करताना सांगितले आहे की सर्व परिवार हा रुग्णाला घरी घेऊन जात असल्याचे सांगितले, तशी नोंदही करण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालयाने खोकला आल्यामुळे त्याची तपासणी करण्यात आल्याचे सांगून त्या पद्धतीने उपचार सुरू केल्याचे सांगितले आहे.


अपघातात जखमी झालेला तरुण भाऊ लचके याचे नशीब चांगले म्हणून ज्यावेळी अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. त्यावेळी खोकला आल्याने तो जिवंत असल्याचे लक्षात आले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता हे मात्र निश्चित केवळ प्रशासन आणि रुग्ण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याकारणाने अशा घटना घडत असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

सेंट झेवियरमधील भूमिगत पाण्याच्या साठवण टाकीचे नियोजन फसले

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील सर्वात मोठे पुरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या हिंदमाता सिनेमा

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोस्टल रोड- मार्वे रोड जोडणाऱ्या मार्गावरील पुलांच्या बांधकामाला आता गती, मागवल्या तब्बल २२०० कोटी रुपयांच्या निविदा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड मार्वे रोडशी जोडणारे नवीन मार्ग आणि

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द

मुंबई : राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के दरवाढ रद्द

यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर, सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणाऱ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस

शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत.