मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर पडली आहे. थंडीच्या दिवसांत नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दरवर्षी प्रदूषण वाढत असून, यावर्षीही प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे. त्यातच एखाद्या परिसरात सलग तीन दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३०० वर नोंदविला गेला, तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून, तेथील बांधकामे बंद केली जाणार आहेत.

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावलेला असून दक्षिण मुंबईपासून पूर्व व पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे मुंबईमधील दृश्यमानता कमी झाली होती. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीत. गुजरात, राजस्थानवरील पट्ट्यात त्याचा प्रभाव दिसला. हे राखेचे कण वातावरणात अत्यंत वरच्या उंचीवर होते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोंदविण्यात आलेले प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचे नाही. मुंबईमधील हवा खराब म्हणजे रोजचे प्रदूषण आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. कारण हवा स्थिर राहते. हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते. प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून, गेल्या वर्षी नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद केली होती. यावर्षीही कारवाई सुरूच राहील, असे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या