उद्योगपती मुकेश अंबानी यांनी भारताच्या जीएसटी सुधारणांचे स्वागत केले

'उपभोग-चालित (Consumption Driven) विकासाला मोठे प्रोत्साहन' असे त्यांनी यावेळी संबोधले 


मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि भारतातील सर्वात मोठ्या रिटेलरपैकी एक रिलायन्स रिटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज भारत सरकारच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांच्या दुसऱ्या पिढीतील सुधारणांचे हा र्दिक स्वागत केले. गुरूवारी सरकारने जीएसटी कपातीला अंतिम मंजुरी जीएसटी काऊन्सिल बैठकीदरम्यान दिली होती. आता जीएसटी ५% व १२% स्लॅबमध्ये आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. याच धर्तीवर उद्योगपती मुकेश अंबानी यांनी हे मोठे विधान केले.


रिलायन्स इंडस्ट्रीजकडून नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले यावेळी मुकेश अंबानी यांनी भारतीय लोकांना दिवाळी भेट देण्याचे ऐतिहासिक वचन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मु केश डी. अंबानी म्हणाले आहेत की,'जीएसटीचे सुसूत्रीकरण हे ग्राहकांसाठी उत्पादने आणि सेवा अधिक परवडणाऱ्या बनवण्याच्या दिशेने, व्यवसाय करण्याच्या ऑपरेशनल गुंतागुंती कमी करण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी आणि किरकोळ क्षेत्रातील उ पभोग वाढीला चालना देण्यासाठी एक प्रगतीशील पाऊल आहे. हे भारताच्या आर्थिक विकासाला मोठे प्रोत्साहन देणारे ठरेल. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ७.८% पर्यंत पोहोचला आहे, नवीन सुधारणांमध्ये अर्थव्यवस्थेला आणखी गती देण्याची क्षमता आहे, ज्यामुळे विकास दर दुप्पट अंकांच्या जवळ जाईल.'


रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक व मुकेश अंबानी यांच्या कन्या ईशा अंबानी म्हणाल्या आहेत की,' एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून नवीन जीएसटी व्यवस्था घरगुती बजेटमध्ये दिलासा देते आणि उद्योगासाठी अनुपालन (Com pliance) सुलभ करते, ज्यामुळे ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही एक अद्वितीय फायदा निर्माण होतो. रिलायन्स रिटेल पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या सर्व उपभोग बास्केटमधील नवीन जीएसटी व्यवस्थाचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्यासाठी वचनबद्ध आहे.'


आपल्या भावना व्यक्त करताना पुढे अंबानी पुढे म्हणाल्या आहेत की,'जीएसटी सुधारणा व्यवसाय करण्याची सुलभता सुधारण्यासाठी आणि ग्राहक कल्याणाला चालना देण्यासाठी सरकारच्या स्पष्ट हेतूचे प्रतिबिंबित करतात. या सुधारणेचा संपूर्ण फायदा आ मच्या ग्राहकांपर्यंत पारदर्शकपणे आणि कोणत्याही विलंबाशिवाय पोहोचावा यासाठी रिलायन्स रिटेल पूर्णपणे वचनबद्ध आहे. आमची प्रतिज्ञा सोपी आहे: जेव्हा जेव्हा खर्च कमी होतो तेव्हा आमच्या ग्राहकांना त्याचा फायदा त्यांच्या खिशात मिळाला पाहिजे'


जीएसटी सुसूत्रीकरण हे भारताच्या उपभोग प्रवासात एक निर्णायक क्षण आहे. खर्च कमी करून, महागाई नियंत्रणात ठेवून, कार्यक्षमता सुधारून आणि मोठ्या प्रमाणात वाढ करून, यामुळे शेतकरी, एमएसएमई, उत्पादक, पुरवठादार, किराणा आणि अंतिम ग्रा हकांसह किरकोळ मूल्य साखळीतील प्रत्येक भागधारकासाठी संधी निर्माण होतील.रिलायन्स रिटेलला या परिवर्तनात आघाडीवर असल्याचा अभिमान आहे, भारतातील १.४ अब्ज लोकांना सुधारणांचा संपूर्ण लाभ देण्यासाठी आणि अधिक समावेशक, स्पर्धात्मक आणि परवडणारी उपभोग अर्थव्यवस्था घडवण्यास मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.' असे अखेरीस त्या म्हणाल्या.


भारताची उपभोगाची कथा (Consumption Story) वाढत असताना, या विकासामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो. रिलायन्स रिटेल लाखो घरांमध्ये मूल्य, गुणवत्ता आणि सुलभता आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने यावेळी नमूद केले आहे. आगामी दिवसात रिलायन्स भारतातील सर्वात मोठा जिओचा आयपीओ आणण्यासाठी सज्ज होऊन रिलायन्स जिओ आयपीओ पुढील वर्षी सुरूवातीला बाजारात गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल.रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कंपनी आहे ज्याचे एकत्रित उत्पन्न (Consolidated Income) १०७११७४ कोटी रूपये (US$ १२५.३अब्ज) आहे. तर रोख नफा (Profit) ८१३०९ कोटी (US$ 17.2 अब्ज) आणि निव्वळ नफा (Net Profit ) ८१३०९ कोटी रुपये (US$ 9 .5 अब्ज) कंपनीला मिळाला आहे. रिलायन्सच्या क्रियाकलापांमध्ये (Activity) हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन आणि उत्पादन, पेट्रोलियम रिफायनिंग आणि मार्केटिंग, पेट्रोकेमिकल्स, प्रगत साहित्य आणि कंपोझिट्स, अक्षय ऊर्जा (सौर आणि हायड्रोजन), रिटेल, डिजिटल सेवा आणि मीडिया आणि मनोरंजन अशा विविध उद्योगांचा समावेश आहे.


सध्या ८८ व्या क्रमांकावर असलेली रिलायन्स ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कंपनी आहे जी फॉर्च्यूनच्या २०२५ च्या 'जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या' जागतिक ५०० यादीत स्थान मिळवते. कंपनी२०२४ च्या 'जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक कं पन्यांच्या' फोर्ब्स ग्लोबल २००० रँकिंगमध्ये ४९ व्या स्थानावर आहे, जी भारतीय कंपन्यांमध्ये सर्वोच्च आहे. रिलायन्सला २०२४ च्या टाईम मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत स्थान मिळाले आहे, ज्यामुळे हा सन्मान दोनदा मिळवणारी ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

Comments
Add Comment

Fairness Cream : धक्कादायक! गोरं करणारी क्रीम ठरतेय धोकादायक; क्रीम वापरल्याने होतोय कायमचा किडणी किंवा गंभीर त्वचाविकार

- डॉक्टरांनी महत्वाची बातमी Fairness Cream : गोरं दिसण्याच्या हव्यासापोटी फेयरनेस क्रीमचा सर्रास वापर करणाऱ्यांसाठी

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

बार्बुडा: वेस्ट इंडिजच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

1 July New Rules : १ जुलैपासून बदलणार अनेक आर्थिक नियम; जाणून घ्या तुमच्या खिश्यावर परिणाम होणार की नाही?

१ जुलै २०२६ पासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक आणि बँकिंग नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम आधार कार्डधारक,

Golden Triangle : परदेशात २५ मराठी तरुणांचे हाल; बीडच्या तरुणाने केला रॅकेटचा पर्दाफाश

बीड: परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांची मानवी तस्करी केल्याचा धक्कादायक

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली  आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर