राज्यात अतिवृष्टीमुळे १४.४४ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर)  शेती पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. १५ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे हे नुकसान झाले आहे.


या नुकसानीमध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय, भाजीपाला, फळे, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड, वाशीम, यवतमाळ, धाराशिव आणि बुलढाणा यांचा समावेश आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात ६.२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.


मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.



सर्वाधिक बाधित जिल्हे


नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर,
वाशीम – १,६४,५५७ हेक्टर,
यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर,
धाराशिव - १,५०,७५३ हेक्टर,
बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,
अकोला – ४३,८२८ हेक्टर,
सोलापूर – ४७,२६६ हेक्टर,
हिंगोली – ४०,००० हेक्टर


बाधित पिके - सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.


एकूण बाधित जिल्हे : नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

Comments
Add Comment

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

CM Devendra Fadnavis Delhi Visit: मुख्यमंत्री फडणवीसांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर विशेष लक्ष, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर निर्णय होणार?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या

Government Job: राज्यात ७० हजार पदांची भरती होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि

Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये तपासणी सुरू, प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज तातडीने