जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा करत असताना, दुसरीकडे कॉँग्रेसने सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे. ज्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.


काल नवी दिल्ली येथे जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या जीएसटी सुसूत्रीकरणाच्या माध्यामातून जीएसटी दराचे दोन टप्पे वगळून ते ५ टक्के आणि १८ टक्के असे करण्यात आले आहेत. यामुळे अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तू, शेतीच्या वस्तू, हरित ऊर्जा, लहान कार आणि सायकली यासह अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहेत. हे नवे कर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे, ज्याचे स्वागत संपूर्ण देशाने केले आहे. मात्र कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे त्याला विरोधच दर्शवला आहे.


काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये आठ वर्षे उशिराने सुसूत्रीकरण आणले आहे. बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर अंदाज लावत, या अचानक उचललेल्या पावलामागे काय कारण आहे, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे. ज्यावर नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर देत, टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.



काय म्हणाले पंतप्रधान?




मोदी म्हणाले की, “मी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी, स्वयंपाकघरातील भांडी असोत किंवा शेतीच्या वस्तू असोत, औषधे असोत किंवा अगदी जीवन विमा असोत, काँग्रेस सरकारने अशा विविध गोष्टींवर वेगवेगळे कर लादले होते.” ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी घरे बांधणे देखील कठीण केले होते. कारण ते सिमेंटवर २९ टक्के कर आकारत होते. याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी प्रवास आणि पर्यटनही खूप कठीण बनवले होते. ते हॉटेलच्या खोल्यांवर १४ टक्के आकारायचे. त्यांनी एअर कंडिशनर, टेलिव्हिजन आणि, पंखे यासारख्या वस्तूंवरही ३१ टक्के कर लादला होता.”


काँग्रेसवर घणाघात करताना मोदी पुढे म्हणाले की, "देशातील कोट्यवधी लोकांची प्राथमिक गरज असलेल्या साध्या सायकलवर कॉँग्रेस १७ टक्के कर आकारत असत. याचबरोबर लाखो माता आणि बहिणींसाठी स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या शिलाई मशीनवरही काँग्रेसने १६ टक्के कर लादला होता”,

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला