जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा करत असताना, दुसरीकडे कॉँग्रेसने सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे. ज्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.


काल नवी दिल्ली येथे जीएसटी कौन्सिलने जाहीर केलेल्या जीएसटी सुसूत्रीकरणाच्या माध्यामातून जीएसटी दराचे दोन टप्पे वगळून ते ५ टक्के आणि १८ टक्के असे करण्यात आले आहेत. यामुळे अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तू, शेतीच्या वस्तू, हरित ऊर्जा, लहान कार आणि सायकली यासह अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहेत. हे नवे कर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे, ज्याचे स्वागत संपूर्ण देशाने केले आहे. मात्र कॉँग्रेसने नेहमीप्रमाणे त्याला विरोधच दर्शवला आहे.


काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये आठ वर्षे उशिराने सुसूत्रीकरण आणले आहे. बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर अंदाज लावत, या अचानक उचललेल्या पावलामागे काय कारण आहे, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे. ज्यावर नरेंद्र मोदी यांनी चोख प्रत्युत्तर देत, टीकाकारांचे तोंड बंद केले आहे.



काय म्हणाले पंतप्रधान?




मोदी म्हणाले की, “मी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी, स्वयंपाकघरातील भांडी असोत किंवा शेतीच्या वस्तू असोत, औषधे असोत किंवा अगदी जीवन विमा असोत, काँग्रेस सरकारने अशा विविध गोष्टींवर वेगवेगळे कर लादले होते.” ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी घरे बांधणे देखील कठीण केले होते. कारण ते सिमेंटवर २९ टक्के कर आकारत होते. याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी प्रवास आणि पर्यटनही खूप कठीण बनवले होते. ते हॉटेलच्या खोल्यांवर १४ टक्के आकारायचे. त्यांनी एअर कंडिशनर, टेलिव्हिजन आणि, पंखे यासारख्या वस्तूंवरही ३१ टक्के कर लादला होता.”


काँग्रेसवर घणाघात करताना मोदी पुढे म्हणाले की, "देशातील कोट्यवधी लोकांची प्राथमिक गरज असलेल्या साध्या सायकलवर कॉँग्रेस १७ टक्के कर आकारत असत. याचबरोबर लाखो माता आणि बहिणींसाठी स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या शिलाई मशीनवरही काँग्रेसने १६ टक्के कर लादला होता”,

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार