विजयदुर्गमध्ये रोरो प्रवासी बोटीचे जल्लोषात स्वागत



विजयदुर्ग : कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झाली आहे. दरम्यान कोकणवासीयांसाठी आता येत्या काही दिवसात रो-रो सर्विस पँसेजरना घेऊन मुंबई -विजयदुर्ग- मुंबई अशी सेवा सुरु होईल असे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजता विजयदुर्ग ग्रामपंचायत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने एम टू एम प्रिन्सेस रो रो बोटीचे कप्तान मृत्युंजय सिंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही रोरो बोट विजयदुर्ग बंदरातील नवीन जेटीवर दाखल झाली होती. मात्र सदर बोटीसाठी बांधण्यात आलेल्या रोपेक्स जेटीवर बोट लावण्यासाठी पाण्याची पुरेशी उंची नसल्याने ती जेटीवर व्यवस्थित उभी राहू शकली नव्हती. त्यामुळे जेटीपासून साधारण एक कि. मी. अंतरावर खाडीत ही बोट उभी करण्यात आली.

बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एम टू एम प्रिन्सेस विजयदुर्ग येथील नवीन रोपेक्स जेटीवर सुव्यवस्थित उभी करण्यात आल्यावर बोटीचे कप्तान मृत्युंजय सिंग आणि कर्मचाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कप्तान मृत्युंजय सिंग यांनी मान्यवरांना बोट आतून फिरवून दाखवली. अर्ध्या तासाच्या स्वागतानंतर सदर रोरो बोट मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान, बोटीचा प्रवास आणि जेटीवरील लँडिंग चाचणी व्यवस्थित झाल्याने बोट सेवा चालू होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे विजयदुर्गवासियांमधून तसेच जिल्ह्यातील सर्वच कोकणवासीयांकडून समाधान व्यक्त होत असून विशेष करून मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.

सहा तासात मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास शक्य : चाचणीही यशस्वी

एम टू एम प्रिन्सेस या बोटीमध्ये विजयदुर्ग जेटीवरून तीन गाड्या बोटीमध्ये चढवून त्या पुन्हा बाहेर काढण्यात आल्या. त्यामुळे ही तिसरी चाचणीही यशस्वी पार पडली आहे. आता फक्त सर्वांना प्रतीक्षा आहे ती बोट चालू होण्याची! यावेळी कप्तान मृत्युंजय सिंग यांनी दै. प्रहारशी बोलताना सांगितलं की, सहा तासात मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास शक्य होणार आहे. दरम्यान, या बोटीमध्ये १८ कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांकडून बोटीतील प्रवाशांना विनम्र सेवा मिळणार आहे. काही किरकोळ त्रुटी दोन दिवसात मार्गी लागणार आहेत असे यावेळी कॅप्टन मृत्युंजय सिंग आणि बंदर अधिकारी उमेश महाडिक यांनी सांगितलं. यावेळी बोलताना जिल्हा भाजप उपाध्यक्ष बाळा खडपे यांनी सांगितलं की, ३८ ते ४० वर्षानंतर पुन्हा एकदा बोटीच्या माध्यमातून कोकणचा मुंबईशी समुद्रमार्गे संपर्क होणार आहे आणि नवीन पिढीसाठी हा अतिशय आनंददायी योग आहे.

Comments
Add Comment

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' सिनेमातील अजय-अतुलच्या 'छत्रपती अँथम'चा 'हा' व्हिडिओ पाहिलात का ?

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'राजा शिवाजी' (Raja Shivaji ) सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

Bigg Boss Marathi 6 : रेस टू फिनालेसाठी लढत रंगली, भाऊचा धक्कामध्ये कोणाला धक्का मिळणार आणि कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ ( Bigg Boss Marathi 6 ) आता शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस मराठीला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.

Tighi Movie : ‘तिघी’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप; न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या