नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!


नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा व्हिसा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.तसा नियम केंद्र सरकारने केला आहे.


गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, “इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (नागरिकत्व) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर, भारतीय नौदल, लष्कर किंवा हवाई दलातील सदस्य, जे कर्तव्यावर भारतात प्रवेश करतात किंवा सोडतात, त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, अशा सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य जेव्हा अशा व्यक्तीसोबत सरकारी वाहनातून प्रवास करतात तेव्हा त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.” असे म्हटले गेले आहे. या आदेशात भर टाकत , “भारतीय नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा नेपाळी किंवा भूतानचा नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा वैध पासपोर्ट असेल आणि नेपाळ किंवा भूतान व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणाहून भारतात प्रवेश करत असेल किंवा बाहेर पडत असेल तर भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वैध पासपोर्ट किंवा इतर वैध प्रवास दस्तऐवज आणि वैध व्हिसा आवश्यक राहणार नाही.”असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. “पण ही सूट चीन, मकाऊ, हाँगकाँग किंवा पाकिस्तानमधून प


मंत्रालयाच्या मते, जर त्यांनी १९५९ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या विशेष प्रवेश परवान्यावर,३० मे २००३ पूर्वी भारतात प्रवेश केला असेल किंवा जर त्यांनी ३० मे २००३ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या नवीन विशेष प्रवेश परवान्यावर केंद्राने नियुक्त केलेल्या भारत-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन चेकपॉईंटद्वारे कायदा सुरू होण्याच्या तारखेपर्यंत भारतात प्रवेश केला असेल तर देखील ही तरतूद लागू होईल.



Comments
Add Comment

अटल पेन्शन योजनेस २०३१ पर्यंत मुदतवाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने लाखो लोकांना पेन्शनची हमी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

नववर्षाच्या पार्टीतून थेट हत्येपर्यंत; खर्चाच्या भीतीने दोन मित्रांनी तरुणाचा घेतला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील रामनगर परिसरात घडलेला तरुणाचा संशयास्पद मृत्यूचा अखेर उलघडा झाला. पोलिस तपासात समोर

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड