नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!


नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा व्हिसा सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही.तसा नियम केंद्र सरकारने केला आहे.


गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, “इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (नागरिकत्व) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर, भारतीय नौदल, लष्कर किंवा हवाई दलातील सदस्य, जे कर्तव्यावर भारतात प्रवेश करतात किंवा सोडतात, त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, अशा सैनिकांच्या कुटुंबातील सदस्य जेव्हा अशा व्यक्तीसोबत सरकारी वाहनातून प्रवास करतात तेव्हा त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसा बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.” असे म्हटले गेले आहे. या आदेशात भर टाकत , “भारतीय नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा नेपाळी किंवा भूतानचा नागरिक नेपाळ किंवा भूतानच्या सीमेवरून रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करत असेल किंवा वैध पासपोर्ट असेल आणि नेपाळ किंवा भूतान व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणाहून भारतात प्रवेश करत असेल किंवा बाहेर पडत असेल तर भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वैध पासपोर्ट किंवा इतर वैध प्रवास दस्तऐवज आणि वैध व्हिसा आवश्यक राहणार नाही.”असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. “पण ही सूट चीन, मकाऊ, हाँगकाँग किंवा पाकिस्तानमधून प


मंत्रालयाच्या मते, जर त्यांनी १९५९ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या विशेष प्रवेश परवान्यावर,३० मे २००३ पूर्वी भारतात प्रवेश केला असेल किंवा जर त्यांनी ३० मे २००३ नंतर काठमांडूमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या नवीन विशेष प्रवेश परवान्यावर केंद्राने नियुक्त केलेल्या भारत-नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन चेकपॉईंटद्वारे कायदा सुरू होण्याच्या तारखेपर्यंत भारतात प्रवेश केला असेल तर देखील ही तरतूद लागू होईल.



Comments
Add Comment

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष