आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

  30

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता. प्रत्येक गावातून “एक शिदोरी आंदोलकांसाठी” या भावनेतून नागरिकांनी मदतीचा ओघ सुरू केला. त्यामुळे तीन दिवसांत तब्बल दहा लाख भाकऱ्या, चटणी, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी व इतर साहित्य जमा झाले. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी या भाकऱ्या व अन्य साहित्याचा प्रचंड साठा करण्यात आला होता. आलेले अन्न लगेच आंदोलकांना पुरवले जात होते; मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मदत आल्यानंतर अखेर समाजातर्फे “आता मदत थांबवा” असे आवाहन करावे लागले.

मंगळवारी संध्याकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर या उरलेल्या भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्या, चटणी, ठेचा, लोणचे यासह इतर अन्नपदार्थ वाया जाऊ नयेत म्हणून मराठा आंदोलकांनी ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी या अन्नसाहित्याचे वर्गीकरण करून वितरणाची व्यवस्था केली. उरलेले अन्न व पाणी सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय तसेच विविध अनाथाश्रमांमध्ये पोहोचवण्यात आले. त्यामुळे आंदोलनादरम्यान लोकांनी केलेली मोठी मदत फुकट न जाता योग्य ठिकाणी पोहोचली.

गावागावांतून सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून ही मदत मुंबईत पाठवली होती. भाकरी, पोळी, चिवडा, फरसाण, खर्डा, ठेचा, लोणचे, पाण्याच्या बाटल्या अशा विविध साहित्याने सिडको प्रदर्शन केंद्र अक्षरशः गजबजून गेले होते. संपूर्ण शहराला जेवण देता येईल एवढा साठा झाल्याने आंदोलनकर्त्यांनी मदत थांबवण्याचे आवाहन केले होते. तरीही या अन्नदानातून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. आंदोलनानंतरही “अन्न वाया घालवायचं नाही, तर गरजूंना द्यायचं” अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने समाजातील ऐक्य व संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.
Comments
Add Comment

मॅरेथॉन स्पर्धेबाबत झाला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात

बीड ते परळी रेल्वे मार्गाबाबत झाला हा निर्णय

मुंबई : रेल्वेमार्गापासून दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळात १५ महत्त्वाचे निर्णय, मुंबई-ठाणे-मेट्रो प्रकल्पांना गती, सविस्तर वाचा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (दि. ३ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Arun Gawli free from Jail : मोठी बातमी : अखेर डॅडी तुरुंगातून बाहेर, १८ वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका!

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या जीआरने ओबीसी नेते नाराज, भुजबळांची मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती तर हाके संतापले

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेल्या जीआरनंतर मराठ्यांची मुंबई मोहीम फत्ते जरी झाली असली, तरी आता