आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता. प्रत्येक गावातून “एक शिदोरी आंदोलकांसाठी” या भावनेतून नागरिकांनी मदतीचा ओघ सुरू केला. त्यामुळे तीन दिवसांत तब्बल दहा लाख भाकऱ्या, चटणी, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी व इतर साहित्य जमा झाले. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी या भाकऱ्या व अन्य साहित्याचा प्रचंड साठा करण्यात आला होता. आलेले अन्न लगेच आंदोलकांना पुरवले जात होते; मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मदत आल्यानंतर अखेर समाजातर्फे “आता मदत थांबवा” असे आवाहन करावे लागले.

मंगळवारी संध्याकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर या उरलेल्या भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्या, चटणी, ठेचा, लोणचे यासह इतर अन्नपदार्थ वाया जाऊ नयेत म्हणून मराठा आंदोलकांनी ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी या अन्नसाहित्याचे वर्गीकरण करून वितरणाची व्यवस्था केली. उरलेले अन्न व पाणी सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय तसेच विविध अनाथाश्रमांमध्ये पोहोचवण्यात आले. त्यामुळे आंदोलनादरम्यान लोकांनी केलेली मोठी मदत फुकट न जाता योग्य ठिकाणी पोहोचली.

गावागावांतून सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून ही मदत मुंबईत पाठवली होती. भाकरी, पोळी, चिवडा, फरसाण, खर्डा, ठेचा, लोणचे, पाण्याच्या बाटल्या अशा विविध साहित्याने सिडको प्रदर्शन केंद्र अक्षरशः गजबजून गेले होते. संपूर्ण शहराला जेवण देता येईल एवढा साठा झाल्याने आंदोलनकर्त्यांनी मदत थांबवण्याचे आवाहन केले होते. तरीही या अन्नदानातून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. आंदोलनानंतरही “अन्न वाया घालवायचं नाही, तर गरजूंना द्यायचं” अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने समाजातील ऐक्य व संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.
Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले