मुंबईत गौरी गणपतीला निरोप

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईतील विविध भागांतील भाविकांनी गौरी आणि गणपतीला निरोप दिला. आपल्या लाडक्या बाप्पासोबतच माहेरवाशिण आलेल्या गौराईला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलावांच्याठिकाणी भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी रात्री वाजेपर्यंत २६ हजार गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.
मंगळवारी गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघ्या मुंबापुरीचे रस्ते दुमदुमून गेले होते. एकच उत्साहाचे वातावरण चहुबाजुला पहायला मिळत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर ढोल आणि ताशांचाही तालावर प्रत्येक जण वाजत गाजत आणि नाचत बाप्पाला निरोप देत होते.

मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.

दीड दिवसा पर्यावरणपुरक आणि पीओपीच्या गणेशमूर्तींना समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास परवानगी नाकारल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढून जिथे शक्य नसेल तिथे पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, गौरीगणपतीसह शाडूमातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन ज्या भागांमध्ये कृत्रिम तलावांची सुविधा नाही तिथे महापालिकेच्यावतीने समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये करण्यास परवानगी दिली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू सह इतर ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असल्याने एमपीसीबीच्या परिपत्रकानुसार विसर्जनासाठी परवानगी दिली जात होती. रात्री नऊवाजेपर्यंत २५७ सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती २३२१६, गौरी २९२० अशाप्रकारे एकूण २६,३९६ गौरी आणि गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांसह काही समुद्रासह तलावांमध्ये विसर्जन करण्यात पार पडले होते.
Comments
Add Comment

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा