मुंबईत गौरी गणपतीला निरोप

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईतील विविध भागांतील भाविकांनी गौरी आणि गणपतीला निरोप दिला. आपल्या लाडक्या बाप्पासोबतच माहेरवाशिण आलेल्या गौराईला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलावांच्याठिकाणी भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी रात्री वाजेपर्यंत २६ हजार गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.
मंगळवारी गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघ्या मुंबापुरीचे रस्ते दुमदुमून गेले होते. एकच उत्साहाचे वातावरण चहुबाजुला पहायला मिळत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर ढोल आणि ताशांचाही तालावर प्रत्येक जण वाजत गाजत आणि नाचत बाप्पाला निरोप देत होते.

मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.

दीड दिवसा पर्यावरणपुरक आणि पीओपीच्या गणेशमूर्तींना समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास परवानगी नाकारल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढून जिथे शक्य नसेल तिथे पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, गौरीगणपतीसह शाडूमातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन ज्या भागांमध्ये कृत्रिम तलावांची सुविधा नाही तिथे महापालिकेच्यावतीने समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये करण्यास परवानगी दिली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू सह इतर ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असल्याने एमपीसीबीच्या परिपत्रकानुसार विसर्जनासाठी परवानगी दिली जात होती. रात्री नऊवाजेपर्यंत २५७ सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती २३२१६, गौरी २९२० अशाप्रकारे एकूण २६,३९६ गौरी आणि गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांसह काही समुद्रासह तलावांमध्ये विसर्जन करण्यात पार पडले होते.
Comments
Add Comment

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Gujarat : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बहिणीचा महापालिकेत पराभव; भाजपने बालेकिल्ला राखला

Gujarat Local Body Election Results 2026: : गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपला गड राखला आहे. मंगळवारी

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

Deepika Padukone Pregnancy : प्रेग्नन्सीतही फुल ऑन अ‍ॅक्शन करताना दिसणार दीपिका पादुकोण, ‘राका’बद्दल वाढली उत्सुकता

प्रेग्नन्सी असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोणचा अ‍ॅक्शन अवतार, कोणताही बदल न करता होणार धमाका! मुंबई :

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह