मुंबईत गौरी गणपतीला निरोप

मुंबई : ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात मुंबईतील विविध भागांतील भाविकांनी गौरी आणि गणपतीला निरोप दिला. आपल्या लाडक्या बाप्पासोबतच माहेरवाशिण आलेल्या गौराईला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या विविध नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि कृत्रिम तलावांच्याठिकाणी भाविकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. सायंकाळी रात्री वाजेपर्यंत २६ हजार गणपती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.
मंगळवारी गौरी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने अवघ्या मुंबापुरीचे रस्ते दुमदुमून गेले होते. एकच उत्साहाचे वातावरण चहुबाजुला पहायला मिळत होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या उत्साहात सहभागी झाले होते. अनेक घरगुती गणपतींसह काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करत मिरवणुका काढल्या होत्या. अनेक ठिकाणी पारंपरिक लोकनृत्यांचे सादरीकरणही करण्यात आले. तर ढोल आणि ताशांचाही तालावर प्रत्येक जण वाजत गाजत आणि नाचत बाप्पाला निरोप देत होते.

मुंबई महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी विसर्जन स्थळांवर विशेष व्यवस्था केली होती. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर, तसेच शहरातील विविध भागांमध्ये तयार केलेल्या कृत्रिम तलावांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक विसर्जन स्थळी प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, आणि अग्निशमन दलाची पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. तसेच, पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्यात आले होते.

दीड दिवसा पर्यावरणपुरक आणि पीओपीच्या गणेशमूर्तींना समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जनास परवानगी नाकारल्यानंतर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी याबाबतचे परिपत्रक काढून जिथे शक्य नसेल तिथे पर्यावरणपुरक गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, गौरीगणपतीसह शाडूमातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन ज्या भागांमध्ये कृत्रिम तलावांची सुविधा नाही तिथे महापालिकेच्यावतीने समुद्रासह इतर नैसर्गिक तलावांमध्ये करण्यास परवानगी दिली होती. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू सह इतर ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा असल्याने एमपीसीबीच्या परिपत्रकानुसार विसर्जनासाठी परवानगी दिली जात होती. रात्री नऊवाजेपर्यंत २५७ सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती २३२१६, गौरी २९२० अशाप्रकारे एकूण २६,३९६ गौरी आणि गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांसह काही समुद्रासह तलावांमध्ये विसर्जन करण्यात पार पडले होते.
Comments
Add Comment

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री तरुणावर गोळीबार; पुढे जे घडलं ते एखाद्या सिनेमासारखंच…

पुणे : पुणे जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणावर

Skirt Fashion: स्टायलिश दिसायचंय? मग हे ट्रेंडी स्कर्ट नक्की ट्राय करा

Ek Hota Maalin Trailer : 'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

मुंबई (Mumbai): काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर

FIFA FINAL | मुंबईतील फुटबॉल चाहत्यांचा निकाल! अर्जेंटिना की स्पेन? कोण उचलणार विश्वचषक?

मुंबई : एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२६

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. धुळगाव येथील एका कष्टकरी