डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणाची वार्ता पोचवणारे दामूदा मोरे यांचे ९२ व्या वर्षी निधन

नागपूर : बाबासाहेब चळवळीतील दामूदा शिवाजी मोरे यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा संवेदनशील अनुयायी हरपला असल्याच्या शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. दामूदा मोरे यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी शहरभर लाऊडस्पीकरने प्रसारित केली होती. त्यांच्या या बातमीने सर्वत्र खळबळ माजली, तसेच यामुळे त्यांना बाबासाहेबांच्या अनुयायांकडून मरण देखील झाली होती.


पंच्याहत्तर वर्षांपूर्वी नागपुरात सर्वात मोठी मोरे साऊंड सर्विस होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नागपुरात होणाऱ्या सर्व सभांमध्ये मोरे साऊंड लावण्यात येत होता. विशेष म्हणजे, गुलाम अली, जगजितिसंग यांच्या कार्यक्रमात दामूदा यांचीच साऊंड सर्विस असायची. गायक किशोरकुमार यांच्याशी त्यांची जवळीक होती, त्यांच्या कार्यक्रमातही दामुदांची सिस्टिम होती. विशेष असे की, दामुदा यांच्या स्कुटरवर मागे बसून किशोरकुमार शहरात फिरले होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५६ च्या धम्मदीक्षा सोहळ्यात मोरे कुटुंबियांचा लाऊस्पीकर होता. काका नामदेव मोरे यांच्या सोबत दामूदा यांनीही दीक्षा घेतली होती. सहा डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यावर पहाटे रिक्षात बॅटरी, हातात माईक अन्‌ डोळ्यात अश्रू घेऊन दामूदा आनंदनगर, भानखेडा, नवी शुक्रवारी, कर्नलबाग, जोगीनगर, इंदोरामध्ये ‘बाबासाहेब गेले...'' एवढेच बोलत फिरत होते. तेव्हा काहींनी त्यांना मारहाण केली होती. त्यांच्या निधनाने दामुदा यांच्या या जुन्या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.


 
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा