पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ


मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष घालून कराराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.


बालग्रामला ३७,८०० चौरस मीटर (३ हेक्टर ७८.३८ आर) जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. त्यापैकी २,६१० चौरस मीटर क्षेत्र पुणे महानगरपालिकेला २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे आता संस्थेकडे ३५,१९० चौरस मीटर जमीन शिल्लक आहे. आता नूतनीकरण मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्ती कायम ठेवून करण्यात आले आहे. यासोबतच, १ ऑगस्ट २०१९ पासून आजपर्यंत प्रचलित वार्षिक दरानुसार, जमिनीच्या किमतीच्या २५ टक्केच्या ०.५ टक्के दराने वार्षिक भुईभाडे आकारले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिका क्रमांक २३७९/२०२३ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून हा निर्णय घेण्यात आला आहे. ​हा निर्णय विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अहवालानंतर महसूल व वन विभागाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बालग्राम संस्थेला त्यांच्या कार्यासाठी आवश्यक जमीन दीर्घकाळासाठी उपलब्ध होणार आहे.


Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०