पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

  12


मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याला राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष लक्ष घालून कराराचे नुतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.


बालग्रामला ३७,८०० चौरस मीटर (३ हेक्टर ७८.३८ आर) जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. त्यापैकी २,६१० चौरस मीटर क्षेत्र पुणे महानगरपालिकेला २० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे आता संस्थेकडे ३५,१९० चौरस मीटर जमीन शिल्लक आहे. आता नूतनीकरण मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्ती कायम ठेवून करण्यात आले आहे. यासोबतच, १ ऑगस्ट २०१९ पासून आजपर्यंत प्रचलित वार्षिक दरानुसार, जमिनीच्या किमतीच्या २५ टक्केच्या ०.५ टक्के दराने वार्षिक भुईभाडे आकारले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिका क्रमांक २३७९/२०२३ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून हा निर्णय घेण्यात आला आहे. ​हा निर्णय विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अहवालानंतर महसूल व वन विभागाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बालग्राम संस्थेला त्यांच्या कार्यासाठी आवश्यक जमीन दीर्घकाळासाठी उपलब्ध होणार आहे.


Comments
Add Comment

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०

Devendra Fadanvis : "आता कोर्टाच्या आदेशांचं प्रशासन पालन करेल" – CM फडणवीसांचा ठाम इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज मुंबई

Manoj Jarange : मनोज जरांगे आंदोलनावर हायकोर्टाचे १० धडाकेबाज निरीक्षणं! सरकारने तात्काळ पावलं उचलावी नाहीतर...हायकोर्टाचा इशारा

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) यांनी मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.