काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


मुंबई : “काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले आहे आणि आजही त्यांनी आपल्या धोरणात बदल केलेला नाही. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालनाचे काम तेथील सरकारकडून सुरू आहे. या देशात जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


तेलंगणमधील नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत, कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले. ते आजही तुष्टीकरण करत आहेत. मात्र, आता लोक त्यांना साथ देणार नाहीत. मनुष्य कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, न्याय सर्वांसाठी समान आहे. मात्र, मतांसाठी सुरू असलेले तुष्टीकरण स्वीकार्य नाही”,



गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सी-६० जवानांनी सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऑपरेशनमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांचे कौतुक करत अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती, आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले, आणि तीन दिवस सलग पोलिसांनी रणनीती आखून दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवले. या चकमकीत नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचा खात्मा झाला. प्रभाकर कंपनी क्रमांक-१० चा प्रभारी असून, गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रमुख होता. त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले होते. मोहिमेत पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजन यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली, तरीही एक पोलीस जवान शहीद झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Mrinal Tai Gore Flyover Extension : अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगावकरांचा वेळ वाचणार, मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पश्चिम येथील राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोडदरम्यानच्या मृणालताई गोरे

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

सुधारित प्रारूपासाठी खारगे समिती स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली