काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


मुंबई : “काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले आहे आणि आजही त्यांनी आपल्या धोरणात बदल केलेला नाही. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालनाचे काम तेथील सरकारकडून सुरू आहे. या देशात जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.


तेलंगणमधील नगरपालिका निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होत. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आव्हान दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत, कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले. ते आजही तुष्टीकरण करत आहेत. मात्र, आता लोक त्यांना साथ देणार नाहीत. मनुष्य कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, न्याय सर्वांसाठी समान आहे. मात्र, मतांसाठी सुरू असलेले तुष्टीकरण स्वीकार्य नाही”,



गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा


गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलविरोधी मोहिमेत सी-६० जवानांनी सात जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऑपरेशनमुळे जिल्ह्यातील नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांचे कौतुक करत अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत नक्षलवाद्यांची एकच कंपनी शिल्लक होती, आणि त्या कंपनीतील प्रमुख सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन दुर्गम आणि घनदाट जंगलात पार पाडण्यात आले, आणि तीन दिवस सलग पोलिसांनी रणनीती आखून दोन बाजूंनी घेरा घालून नक्षलवाद्यांना अडवले. या चकमकीत नक्षल संघटनेचा महत्त्वाचा नेता प्रभाकर याचा खात्मा झाला. प्रभाकर कंपनी क्रमांक-१० चा प्रभारी असून, गडचिरोली विभागीय कमिटी आणि वेस्ट सब-झोनल ब्युरोचा प्रमुख होता. त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले गेले होते. मोहिमेत पोलिसांनी संयम, धैर्य आणि अचूक नियोजन यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवली, तरीही एक पोलीस जवान शहीद झाला. शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Comments
Add Comment

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न