गणेश विसर्जनानिमित्ताने उद्यापासून रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी:  गणेश विसर्जना निमित्ताने दिनांक २, ४, ६ आणि ७ सप्टेंबरला रत्नागिरी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी गौरीगणपती, ४   सप्टेंबर रोजी ९ दिवसांचे गणपती, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आणि ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. यावेळी मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या प्रत्येक गणेशमूर्तीसह वाहने येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मांडवी समुद्र किनारी सार्वजनिक व खासगी गणपती मूर्ती वाहनातून विसर्जन करण्यासाठी रामनाका - राधाकृष्ण नाका - गोखलेनाका विठ्ठल मंदिर - काँग्रेस भवन या मार्गाने मांडवी समुद्र किनारी जातात. या मुदतीत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ परिसरात भाविकांची व खरेदीदार यांची वर्दळ असल्याने जे भाविक गणपती विसर्जनाकरिता वाहने घेऊन येणार आहेत, त्यांच्याच वाहनांना आत प्रवेश देऊन अन्य वाहनांना प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याकरिता गणपती विसर्जनादिवशी दुपारी ते रात्री १२ या वेळेत गणेशमूर्ती विसर्जनाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरीक्त अन्य वाहनांना रामनाका राधाकृष्ण नाका- गोखलेनाका विठ्ठल मंदिर काँग्रेस भवन मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजारचौक- भुतेनाका मत्स्यालय -मांडवी समुद्र किनारा या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा