गणेश विसर्जनानिमित्ताने उद्यापासून रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल

रत्नागिरी:  गणेश विसर्जना निमित्ताने दिनांक २, ४, ६ आणि ७ सप्टेंबरला रत्नागिरी शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी, २ सप्टेंबर रोजी गौरीगणपती, ४   सप्टेंबर रोजी ९ दिवसांचे गणपती, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आणि ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. त्यामुळे या दिवशी रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू राहील. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे. यावेळी मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या प्रत्येक गणेशमूर्तीसह वाहने येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मांडवी समुद्र किनारी सार्वजनिक व खासगी गणपती मूर्ती वाहनातून विसर्जन करण्यासाठी रामनाका - राधाकृष्ण नाका - गोखलेनाका विठ्ठल मंदिर - काँग्रेस भवन या मार्गाने मांडवी समुद्र किनारी जातात. या मुदतीत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ परिसरात भाविकांची व खरेदीदार यांची वर्दळ असल्याने जे भाविक गणपती विसर्जनाकरिता वाहने घेऊन येणार आहेत, त्यांच्याच वाहनांना आत प्रवेश देऊन अन्य वाहनांना प्रवेश प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्याकरिता गणपती विसर्जनादिवशी दुपारी ते रात्री १२ या वेळेत गणेशमूर्ती विसर्जनाकरिता येणाऱ्या वाहनांव्यतिरीक्त अन्य वाहनांना रामनाका राधाकृष्ण नाका- गोखलेनाका विठ्ठल मंदिर काँग्रेस भवन मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजारचौक- भुतेनाका मत्स्यालय -मांडवी समुद्र किनारा या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय व मंत्री महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली वाहने यांना लागू होणार नाही.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

Gold Silver Rate Today: सलग दोन दिवस उसळलेले सोने आज घसरले 'हे' आहे सोन्याचे जागतिक विश्लेषण

मोहित सोमण: सोन्यातील विशेषतः एकूणच कमोडिटीतील अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढल्याने दोन विरुद्ध दिशेने कमोडिटी

नवी मुंबईत ११ महिन्यांत ३४९ मुली बेपत्ता !

नवी मुंबई : नवी मुंबईतून १ जानेवारी ते २९ नोव्हेंबर २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४९९ मुले-मुली बेपत्ता

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक