'मनोज जरांगे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब'


मुंबई : मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्याची आग्रही मागणी करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जरांगेंसोबत त्यांचे शेकडो समर्थक मुंबईत आले आहेत. मुंबई पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदानावर रविवार संध्याकाळपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधरी महायुतीतील भाजपचे आमदार संजय केणेकर यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.


मनोज जरांगे यांच्याकडे शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब म्हणून बघितले जात आहे, असे आमदार संजय केणेकर म्हणाले. जरांगे नावाच्या सुसाईड बॉम्बमुळे नुकसान होणार आहे. पण हे नुकसान पवारांचे असेल. शरद पवारांसाठी जरांगे नावाचा सुसाईड बॉम्ब एक बुमरँग ठरेल, असेही आमदार संजय केणेकर म्हणाले. पवार समाजाचे नुकसान करणारी कृती करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विषयीच्या वैयक्तिक द्वेषातून जरांगे या व्यक्तीला पुढे केले आहे, असे आमदार संजय केणेकर म्हणाले.


शरद पवारांनी वसंतदादांपासून आतापर्यंत जे जे त्यांना राजकीयदृष्ट्या आव्हान वाटले त्या सर्वांविरुद्ध कट कारस्थानं करुन त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. सध्या ते फडणवीसांना त्रास देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण या प्रयत्नात ते यशस्वी होणार नाहीत, असा विश्वास आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

कामाचा ताण येतो म्हणून नर्सने १० रुग्णांना ठार मारले

पोलीस तपासात नर्सने आणखी २७ जणांना मारण्याची तयारी केली होती हे उघड न्यायालयाने आरोपी नर्सला जन्मठेपेची शिक्षा

५ रुपयांत पोटभर जेवण!

दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा नवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, ऑस्ट्रेलियानंतर आता 'या' देशातही कडक निर्बंध

डेन्मार्क : ऑस्ट्रेलियानं त्यांच्या देशातील लहान मुलांवर सोशल मीडिया वापरावर बंदी घातली होती. आता डेन्मार्क

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय

एसटीने गणपतीला कमावले आणि दिवाळीत गमावले! कारण काय?

एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटका तिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूट मुंबई : दिवाळीसारख्या

'बिहारमध्ये घुसखोर नाही, स्थानिकच सरकार बनवतील!'

विकास आणि सुरक्षेसाठी 'एनडीए'ला निवडून देण्याचे अमित शाह यांचे आवाहन पूर्णिया: "बिहारमध्ये घुसखोर सरकार बनवणार