रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई


रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच रेल्वेच्या हद्दीत दुर्घटना घडतात. ताजी घटना कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात घडली. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. पण फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे.





लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी गाडी शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या फलाट क्रमांक एक वर आली. ही गाडी फलाटावर येऊन पूर्ण थांबण्याआधीच एका तरुणाने उतरण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. तरुण संकटात असल्याची जाणीव होताच फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. तिघांनी रेल्वे खाली जात असलेल्या तरुणाला वेगाने खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.


कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी तरुणाला वाचवले. मिळालेल्या माहिती नुसार तरुण गोळप रत्नागिरी येथील निवासी होता. जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले आणि तिघांचे कौतुक केले.


Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक जाहीर

पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन