रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई


रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच रेल्वेच्या हद्दीत दुर्घटना घडतात. ताजी घटना कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात घडली. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. पण फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे.





लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी गाडी शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या फलाट क्रमांक एक वर आली. ही गाडी फलाटावर येऊन पूर्ण थांबण्याआधीच एका तरुणाने उतरण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. तरुण संकटात असल्याची जाणीव होताच फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. तिघांनी रेल्वे खाली जात असलेल्या तरुणाला वेगाने खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.


कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी तरुणाला वाचवले. मिळालेल्या माहिती नुसार तरुण गोळप रत्नागिरी येथील निवासी होता. जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले आणि तिघांचे कौतुक केले.


Comments
Add Comment

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

पंतप्रधानांबाबतचे काँग्रेस खासदारांचे वर्तन संसदेच्या परंपरेला काळीमा फासणारे

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र मुंबई : देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभेमध्ये

Islamabad Blast: मशिदीत नमाज सुरु असताना स्फोट, १२ ठार; इस्लामाबादमध्ये आणीबाणी घोषित

इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील एका इमामबारगाहमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा!, मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस