रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील धक्कादायक व्हिडीओ, तरुणाला भोवली अतिघाई


रत्नागिरी : चालत्या गाडीत चढू नये किंवा चालत्या गाडीतून उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासन वारंवार करते. पण अनेकजण या आवाहनाकडे दुर्लक्ष करतात. यामुळेच रेल्वेच्या हद्दीत दुर्घटना घडतात. ताजी घटना कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात घडली. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. पण फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होत आहे.





लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी गाडी शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरीच्या फलाट क्रमांक एक वर आली. ही गाडी फलाटावर येऊन पूर्ण थांबण्याआधीच एका तरुणाने उतरण्याचा प्रयत्न केला. चालत्या गाडीतून तरुण चुकीच्या पद्धतीने उतरला. यामुळे तरुणाचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली जाऊ लागला. तरुण संकटात असल्याची जाणीव होताच फलाटावर असलेल्या दोन आरपीएफ जवानांनी तसेच एका विक्रेत्याने सतर्कतेने तरुणाचे प्राण वाचवले. तिघांनी रेल्वे खाली जात असलेल्या तरुणाला वेगाने खेचले. त्यामुळे तरुणाचे प्राण वाचले.


कोकण रेल्वेचे आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी तरुणाला वाचवले. मिळालेल्या माहिती नुसार तरुण गोळप रत्नागिरी येथील निवासी होता. जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले आणि तिघांचे कौतुक केले.


Comments
Add Comment

Mayor Election 2026: राज्यातील ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर

- भाजपची सरशी; मुंबईचा प्रथम नागरिक कोण हे उद्या स्पष्ट होणार मुंबई: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज

Eknath Shinde: म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

मुंबई : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

BMC Mayor Election 2026: शरद पवार शिंदेंना पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, रेपो रेटचा दर कायम; कर्जदारांना दिलासा नाही

मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी