जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल, पोलिसांच्या सुट्या रद्द, रस्ते वाहतूक मंदावली


मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले. जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवार ३० ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंतच परवानगी दिली आहे. यामुळे मुदत संपल्यानंतर पुढे काय होणार हा प्रश्न आहे.


जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्या रद्द


मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबई पोलीस दलातील सुटीवर असलेल्या पोलिसांना तातडीने ड्युटी जॉइन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पोलिसांना ड्युटीवर हजर राहण्याचे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आधीच गणेशोत्सवामुळे मुंबई पोलिसांवर सुरक्षेचा ताण आहे. हा ताण असतानाच जरांगेंनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे.


आंदोलनामुळे रस्ते वाहतूक मंदावली


मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर फक्त पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्यासाठी जरांगेंना परवानगी दिली होती. प्रत्यक्षात आझाद मैदानावर परवानगीपेक्षा जास्त आंदोलक गोळा झाले आहेत. मुंबईत मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे. या चिखलाचे कारण देत मैदानावर खडी टाकण्याचा आग्रह जरांगे समर्थक करत आहेत. या मागणीसाठी शेकडो जरांगे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. जरांगे समर्थकांच्या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली होती. अनेक जरांगे समर्थकांच्या गाड्या अजूनही वेगवेगळ्या गावांतून मुंबईत येत आहेत. यामुळे वाशी खाडी पूल तसेच मुंबई ठाण्याच्या वेशीवर सकाळपासूनच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पोलिसांनी जरांगे समर्थकांना टोल नाक्यांजवळच्या मोकळ्या जागेवर वाहनं उभी करुन रेल्वेने पुढील प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. 


जरांगे समर्थकांनी रस्त्यावर घातला धिंगाणा


शेकडो जरांगे समर्थकांनी रस्त्यावर नाचत धिंगाणा घातला. वाटेल त्या रस्त्यावर रास्ता रोको करत वाहतुकीची कोंडी केली. पोलिसांनी जरांगे समर्थकांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही जरांगे समर्थकांनी मुंबई महापालिकेजवळ सजावटीसाठी म्हणून उभारलेल्या छोट्या कृत्रिम हौदाच्या पाण्यात आंघोळ केली आणि इतरांनाही रस्त्यावरच आंघोळ करण्यास सांगितले. यामुळे महापालिका मुख्यालयाजवळच्या रस्त्याला ओंगळवाणे स्वरुप आले.


Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला