जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांचे हाल, पोलिसांच्या सुट्या रद्द, रस्ते वाहतूक मंदावली


मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू केले. जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवार ३० ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंतच परवानगी दिली आहे. यामुळे मुदत संपल्यानंतर पुढे काय होणार हा प्रश्न आहे.


जरांगेंच्या आंदोलनामुळे पोलिसांच्या सुट्या रद्द


मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मुंबई पोलीस दलातील सुटीवर असलेल्या पोलिसांना तातडीने ड्युटी जॉइन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पोलिसांना ड्युटीवर हजर राहण्याचे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आधीच गणेशोत्सवामुळे मुंबई पोलिसांवर सुरक्षेचा ताण आहे. हा ताण असतानाच जरांगेंनी आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे.


आंदोलनामुळे रस्ते वाहतूक मंदावली


मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर फक्त पाच हजार समर्थकांसह आंदोलन करण्यासाठी जरांगेंना परवानगी दिली होती. प्रत्यक्षात आझाद मैदानावर परवानगीपेक्षा जास्त आंदोलक गोळा झाले आहेत. मुंबईत मध्यरात्री झालेल्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झाला आहे. या चिखलाचे कारण देत मैदानावर खडी टाकण्याचा आग्रह जरांगे समर्थक करत आहेत. या मागणीसाठी शेकडो जरांगे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. जरांगे समर्थकांच्या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावर काही काळ वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडली होती. अनेक जरांगे समर्थकांच्या गाड्या अजूनही वेगवेगळ्या गावांतून मुंबईत येत आहेत. यामुळे वाशी खाडी पूल तसेच मुंबई ठाण्याच्या वेशीवर सकाळपासूनच वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पोलिसांनी जरांगे समर्थकांना टोल नाक्यांजवळच्या मोकळ्या जागेवर वाहनं उभी करुन रेल्वेने पुढील प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. 


जरांगे समर्थकांनी रस्त्यावर घातला धिंगाणा


शेकडो जरांगे समर्थकांनी रस्त्यावर नाचत धिंगाणा घातला. वाटेल त्या रस्त्यावर रास्ता रोको करत वाहतुकीची कोंडी केली. पोलिसांनी जरांगे समर्थकांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही जरांगे समर्थकांनी मुंबई महापालिकेजवळ सजावटीसाठी म्हणून उभारलेल्या छोट्या कृत्रिम हौदाच्या पाण्यात आंघोळ केली आणि इतरांनाही रस्त्यावरच आंघोळ करण्यास सांगितले. यामुळे महापालिका मुख्यालयाजवळच्या रस्त्याला ओंगळवाणे स्वरुप आले.


Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,